AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?

टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजचे सामने सुरु आहेत. पण सर्व भारतीयांच्या नजरा या 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडेच लागून आहेत.

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 3:34 PM
Share

मुंबई: सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वल क्रमाकांचा फलंदाज म्हटलं तर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचच नाव डोळ्यासमोर येतं. सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक रेकॉर्ड्स करणारा भारतीय असणाऱ्या विराटला एका रेकॉर्डपासून मात्र अद्यापर्यंत दूर राहावं लागलं आहे. ज्याची तो मागील अनेक वर्ष वाट पाहत असून यंदाच्या टी20 विश्वचषकात तरी तो हा रेकॉर्ड नावे करतो का? हे पाहावे लागेल.

तर हा रेकॉर्ड म्हणजे टी20 सामन्यात शतक झळकावण्याचा आहे. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये  सर्वाधिक शतकं नावावर असलेल्या विराटने वनडेमध्ये 43 आणि टेस्ट सामन्यांत 27 अशी एकूण 70 शतकं लगावली आहेत. पण टी20 क्रिकेटमध्ये तो एकही शतक लगावू शकलेला नाही. त्यामुळे त्याने आता या टी20 विश्वचषकात एकही शतक लगावल्यास तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक लगावण्याचा रेकॉर्ड करेल.

चौथा भारतीय बनण्याचा मान

विराटने यंदा शतक लगावल्यास तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक लगावणारा चौथा भारतीय बनेल. याआधी रोहित शर्मा, केएल राहुल आणि सुरेश रैना या तिघांनी ही कामगिरी केली असून आता विराटने शतक लगावल्यास तोही यांच्या पंगतीत स्थान मिळवेल. सध्या विराटचा सर्वोच्च टी20 स्कोर 94 इतका आहे.

टी20 मध्ये विराटची लय उत्तम

टी20 क्रिकेटचा विचार करता विराटचा रेकॉर्ड तसा उत्तम आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वााधिक धावा विराटच्याच नावे असून त्याने 3 हजार 159 धावा केल्या आहेत. तसंच सर्वाधिक अर्धशतकंही कोहलीच्याच नावे आहेत. विशेष म्हणजे यंदा तो टी20 विश्वचषकात शतक लगावल्यास नवा रेकॉर्ड तर करेलच. पण सोबतच शतकांचा दुष्काळही संपवेल. विराटने मागील 2 वर्ष एकही शतक लागवलेलं नाही. अखेरचं शतक त्याने नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध कोलकाता येथील कसोटीत लागवलं होतं.

हे ही वाचा

रवी शास्त्री दिसणार जुन्या भूमिकेत, फलंदाजी प्रशिक्षकांची नजर प्रमोशनवर? जाणून घ्या BCCI सोबतचा करार संपल्यानंतरचं प्लॅनिगं

T20 World Cup स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी थरारक सामना, स्कॉटलंडचा बांगलादेशवर निसटता विजय

राहुल द्रविड टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक होणार असल्याच्या चर्चा; विराट कोहली म्हणाला…

(Will Virat kohli score first T20 Century in India vs Pakistan match at T20 World Cup 2021)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.