AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?

टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजचे सामने सुरु आहेत. पण सर्व भारतीयांच्या नजरा या 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडेच लागून आहेत.

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 3:34 PM
Share

मुंबई: सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वल क्रमाकांचा फलंदाज म्हटलं तर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचच नाव डोळ्यासमोर येतं. सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक रेकॉर्ड्स करणारा भारतीय असणाऱ्या विराटला एका रेकॉर्डपासून मात्र अद्यापर्यंत दूर राहावं लागलं आहे. ज्याची तो मागील अनेक वर्ष वाट पाहत असून यंदाच्या टी20 विश्वचषकात तरी तो हा रेकॉर्ड नावे करतो का? हे पाहावे लागेल.

तर हा रेकॉर्ड म्हणजे टी20 सामन्यात शतक झळकावण्याचा आहे. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये  सर्वाधिक शतकं नावावर असलेल्या विराटने वनडेमध्ये 43 आणि टेस्ट सामन्यांत 27 अशी एकूण 70 शतकं लगावली आहेत. पण टी20 क्रिकेटमध्ये तो एकही शतक लगावू शकलेला नाही. त्यामुळे त्याने आता या टी20 विश्वचषकात एकही शतक लगावल्यास तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक लगावण्याचा रेकॉर्ड करेल.

चौथा भारतीय बनण्याचा मान

विराटने यंदा शतक लगावल्यास तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक लगावणारा चौथा भारतीय बनेल. याआधी रोहित शर्मा, केएल राहुल आणि सुरेश रैना या तिघांनी ही कामगिरी केली असून आता विराटने शतक लगावल्यास तोही यांच्या पंगतीत स्थान मिळवेल. सध्या विराटचा सर्वोच्च टी20 स्कोर 94 इतका आहे.

टी20 मध्ये विराटची लय उत्तम

टी20 क्रिकेटचा विचार करता विराटचा रेकॉर्ड तसा उत्तम आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वााधिक धावा विराटच्याच नावे असून त्याने 3 हजार 159 धावा केल्या आहेत. तसंच सर्वाधिक अर्धशतकंही कोहलीच्याच नावे आहेत. विशेष म्हणजे यंदा तो टी20 विश्वचषकात शतक लगावल्यास नवा रेकॉर्ड तर करेलच. पण सोबतच शतकांचा दुष्काळही संपवेल. विराटने मागील 2 वर्ष एकही शतक लागवलेलं नाही. अखेरचं शतक त्याने नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध कोलकाता येथील कसोटीत लागवलं होतं.

हे ही वाचा

रवी शास्त्री दिसणार जुन्या भूमिकेत, फलंदाजी प्रशिक्षकांची नजर प्रमोशनवर? जाणून घ्या BCCI सोबतचा करार संपल्यानंतरचं प्लॅनिगं

T20 World Cup स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी थरारक सामना, स्कॉटलंडचा बांगलादेशवर निसटता विजय

राहुल द्रविड टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक होणार असल्याच्या चर्चा; विराट कोहली म्हणाला…

(Will Virat kohli score first T20 Century in India vs Pakistan match at T20 World Cup 2021)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.