AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup : भारत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीची लढत, सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोण?

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चार संघ ठरले. आता कोणासोबत कोणाची लढत हे देखील स्पष्ट झालं आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना होणार आहे.

Womens World Cup : भारत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीची लढत, सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोण?
Womens World Cup : भारत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीची लढत, सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोण?Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Oct 25, 2025 | 10:10 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यांचे वेध लागले आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि भारताने धडक मारली आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ टॉपला राहिला. तर भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. उपांत्य फेरीची लढत 30 ऑक्टोबरला होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे. उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट असलं तरी या संपूर्ण स्पर्धेवर पावसाचं सावट राहिलं आहे. त्यामुळे उपांत्य पावसाने हजेरी लावली तर काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. साखळी फेरीत पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर 1-1 गुण वाटून दिला जात होता. पण उपांत्य फेरीत तसं काही करता येणार नाही. मग उपांत्य फेरीच्या सामन्याचा निकाल कसा लागणार? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर पुढे आहे.

उपांत्य फेरीत पावसाने हजेरी लावली तर…

उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर एक अतिरिक्त दिवस देण्यात आला आहे. सामना जिथे संपला तेथून पुढच्या दिवशी सामना सुरु होईल. म्हणजेच दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर हा सामना दुसऱ्या दिवशी होईल. 29 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. जर त्या दिवशी झाला नाही तर 30 ऑक्टोबरला जेथे थांबला तेथून सुरु होईल. असंच भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचं आहे. हा सामना 30 ऑक्टोबरला होणार आहे. पण 31 ऑक्टोबरचा दिवस राखीव असणार आहे. पण राखीव दिवशीही सामना झाला नाही तर काय?

राखीव दिवशीही सामना झाला नाही तर अंतिम फेरीतील संघाचा निकाल गुणतालिकेवरून ठरवला जाईल. म्हणजेच भारत ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे झालाच नाही तर अंतिम फेरीचं तिकीट ऑस्ट्रेलियाला मिळेल. असंच दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या सामन्यात असेल. जो संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असेल त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल.

अंतिम सामना पावसामुळे झाला नाही तर..

उपांत्य फेरीप्रमाणे अंतिम फेरीसाठीही एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. अंतिम फेरीचा सामना 2 नोव्हेंबरला होणार आहे. त्या दिवशी पावसामुळे सामना झाला नाही तर 3 नोव्हेंबरला होईल. पण या दिवशीही सामना झाला नाही तर अंतिम फेरीत स्थान मिळवलेल्या दोन्ही संघांना विजयी घोषित केलं जाईल.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या