AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup : भारत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीची लढत, सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोण?

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चार संघ ठरले. आता कोणासोबत कोणाची लढत हे देखील स्पष्ट झालं आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना होणार आहे.

Womens World Cup : भारत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीची लढत, सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोण?
Womens World Cup : भारत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीची लढत, सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोण?Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Oct 25, 2025 | 10:10 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यांचे वेध लागले आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि भारताने धडक मारली आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ टॉपला राहिला. तर भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. उपांत्य फेरीची लढत 30 ऑक्टोबरला होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे. उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट असलं तरी या संपूर्ण स्पर्धेवर पावसाचं सावट राहिलं आहे. त्यामुळे उपांत्य पावसाने हजेरी लावली तर काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. साखळी फेरीत पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर 1-1 गुण वाटून दिला जात होता. पण उपांत्य फेरीत तसं काही करता येणार नाही. मग उपांत्य फेरीच्या सामन्याचा निकाल कसा लागणार? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर पुढे आहे.

उपांत्य फेरीत पावसाने हजेरी लावली तर…

उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर एक अतिरिक्त दिवस देण्यात आला आहे. सामना जिथे संपला तेथून पुढच्या दिवशी सामना सुरु होईल. म्हणजेच दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर हा सामना दुसऱ्या दिवशी होईल. 29 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. जर त्या दिवशी झाला नाही तर 30 ऑक्टोबरला जेथे थांबला तेथून सुरु होईल. असंच भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचं आहे. हा सामना 30 ऑक्टोबरला होणार आहे. पण 31 ऑक्टोबरचा दिवस राखीव असणार आहे. पण राखीव दिवशीही सामना झाला नाही तर काय?

राखीव दिवशीही सामना झाला नाही तर अंतिम फेरीतील संघाचा निकाल गुणतालिकेवरून ठरवला जाईल. म्हणजेच भारत ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे झालाच नाही तर अंतिम फेरीचं तिकीट ऑस्ट्रेलियाला मिळेल. असंच दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या सामन्यात असेल. जो संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असेल त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल.

अंतिम सामना पावसामुळे झाला नाही तर..

उपांत्य फेरीप्रमाणे अंतिम फेरीसाठीही एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. अंतिम फेरीचा सामना 2 नोव्हेंबरला होणार आहे. त्या दिवशी पावसामुळे सामना झाला नाही तर 3 नोव्हेंबरला होईल. पण या दिवशीही सामना झाला नाही तर अंतिम फेरीत स्थान मिळवलेल्या दोन्ही संघांना विजयी घोषित केलं जाईल.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...