AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतापेक्षा बांगलादेश वरचढ, जिंकूनही इंग्लंडचा तोटाच

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत प्रत्येक सामन्यानंतर उलटफेर दिसून येतो. असाच फरक भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात दिसून आला. भारताला मोठा फटका बसला असून बांगलादेशचा संघ वरचढ ठरला आहे. भारताची अंतिम फेरीची वाट बिकट झाली आहे.

WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतापेक्षा बांगलादेश वरचढ, जिंकूनही इंग्लंडचा तोटाच
WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची भारताची वाट कठीण, इंग्लंडला जिंकूनही नुकसान
| Updated on: Jan 29, 2024 | 3:18 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारत विरुद्ध इंग्लंडसामन्यानंतर बराच फरक दिसून आला आहे. या कसोटी सामन्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे विपरीत लागला. इंग्लंडने भारताला मायदेशात पराभूत केलं आहे. तसेच बेझबॉल काय असतं याची प्रतिची दाखवून दिली आहे. भारतीय संघ वारंवार काही खेळाडूंवर अवलंबून असल्याचं यातून दिसून आलं. त्यानुसार इंग्लंडने रणनिती आखली आणि भारताला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत केलं. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. भारतीय मातीशी जुळवून घेताना इंग्लंडला थोडा वेळ लागला. मात्र दुसऱ्या डावात आपली बेझबॉल रणनिती काय आहे ते दाखवून दिलं. चौथ्या दिवशीत कसोटीचा निकाल लागला. पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद 246 धावा केल्या. भारताने प्रत्युत्तरात 436 धावा केल्या. मग इंग्लंडने दुसऱ्या डावात तोडीस तोड उत्तर दिलं. भारताची आघाडी मोडून काढत 230 धावांचं आव्हान विजयासाठी दिलं. पण भारताचं संघ फक्त 202 धावा करू शकला आणि 28 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

पहिल्या कसोटीतील पराभवामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. बांगलादेशचा संघ भारतापेक्षा वरचढ ठरला आहे. इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न पहिल्याच कसोटीत संपुष्टात आलं आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपची अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ विजयी टक्केवारी 55 सह अव्वल स्थानी आहे. दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश 50 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर भारताची दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. भारताची विजयी टक्केवारी 43.33 झाली आहे.

पाकिस्तानचा संघ 36.66 विजयी टक्केवारीसह सहाव्या, 33.33 टक्क्यांसह वेस्ट इंडिज सातव्या, 29.16 टक्क्यांसह इंग्लंडचा संघ आठव्या, तर शून्य विजयी टक्केवारीसह श्रीलंकेचा संघ एकदम तळाशी आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा मार्ग सुकर करण्यासाठी ही कसोटी मालिका खरं तर 5-0 ने जिंकणं गरजेचं होतं. पण पहिल्या कसोटीत मात खाल्ल्यानंतर उर्वरित 4 सामने जिंकणं महत्त्वाचं आहे. अन्यथा अंतिम फेरी गाठणं कठीण होईल.

Follow Us
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.