AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतापेक्षा बांगलादेश वरचढ, जिंकूनही इंग्लंडचा तोटाच

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत प्रत्येक सामन्यानंतर उलटफेर दिसून येतो. असाच फरक भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात दिसून आला. भारताला मोठा फटका बसला असून बांगलादेशचा संघ वरचढ ठरला आहे. भारताची अंतिम फेरीची वाट बिकट झाली आहे.

WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतापेक्षा बांगलादेश वरचढ, जिंकूनही इंग्लंडचा तोटाच
WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची भारताची वाट कठीण, इंग्लंडला जिंकूनही नुकसान
| Updated on: Jan 29, 2024 | 3:18 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारत विरुद्ध इंग्लंडसामन्यानंतर बराच फरक दिसून आला आहे. या कसोटी सामन्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे विपरीत लागला. इंग्लंडने भारताला मायदेशात पराभूत केलं आहे. तसेच बेझबॉल काय असतं याची प्रतिची दाखवून दिली आहे. भारतीय संघ वारंवार काही खेळाडूंवर अवलंबून असल्याचं यातून दिसून आलं. त्यानुसार इंग्लंडने रणनिती आखली आणि भारताला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत केलं. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. भारतीय मातीशी जुळवून घेताना इंग्लंडला थोडा वेळ लागला. मात्र दुसऱ्या डावात आपली बेझबॉल रणनिती काय आहे ते दाखवून दिलं. चौथ्या दिवशीत कसोटीचा निकाल लागला. पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद 246 धावा केल्या. भारताने प्रत्युत्तरात 436 धावा केल्या. मग इंग्लंडने दुसऱ्या डावात तोडीस तोड उत्तर दिलं. भारताची आघाडी मोडून काढत 230 धावांचं आव्हान विजयासाठी दिलं. पण भारताचं संघ फक्त 202 धावा करू शकला आणि 28 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

पहिल्या कसोटीतील पराभवामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. बांगलादेशचा संघ भारतापेक्षा वरचढ ठरला आहे. इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न पहिल्याच कसोटीत संपुष्टात आलं आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपची अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ विजयी टक्केवारी 55 सह अव्वल स्थानी आहे. दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश 50 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर भारताची दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. भारताची विजयी टक्केवारी 43.33 झाली आहे.

पाकिस्तानचा संघ 36.66 विजयी टक्केवारीसह सहाव्या, 33.33 टक्क्यांसह वेस्ट इंडिज सातव्या, 29.16 टक्क्यांसह इंग्लंडचा संघ आठव्या, तर शून्य विजयी टक्केवारीसह श्रीलंकेचा संघ एकदम तळाशी आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा मार्ग सुकर करण्यासाठी ही कसोटी मालिका खरं तर 5-0 ने जिंकणं गरजेचं होतं. पण पहिल्या कसोटीत मात खाल्ल्यानंतर उर्वरित 4 सामने जिंकणं महत्त्वाचं आहे. अन्यथा अंतिम फेरी गाठणं कठीण होईल.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.