AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final Weather Update : भारत-न्यूझीलंड सामना रंगात, आजचा दिवस महत्त्वाचा, मॅचबाबत साऊदम्पटनमधून मोठी बातमी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना चांगलाच रंगात आला असून आजचा राखीव दिवसही खेळवला जाणार आहे. पावसामुळे सतत व्यत्यय येणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.

WTC Final Weather Update : भारत-न्यूझीलंड सामना रंगात, आजचा दिवस महत्त्वाचा, मॅचबाबत साऊदम्पटनमधून मोठी बातमी
WTC Final 2021
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 1:01 PM
Share

WTC Final Weather Update : मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची स्पर्धा (ICC WTC Final) आता अंतिम टप्प्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात इंग्लंडच्या साऊदम्पटन (Southmpton) मैदानात सुरु असलेल्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशीपासून पावसाचा व्यत्यय येतच आहे. त्यामुळे 5 दिवसांपैकी केवळ 3 दिवसाचाच खेळ झाला आहे. त्यातही संपूर्ण ओव्हर खेळवल्या गेल्या नसून पहिला आणि तिसरा दिवस मिळून 141.2 ओव्हर्सच खेळल्या गेल्या आहेत. तर पाचव्या दिवशीही पावसामुळे अर्धा तास उशीराने खेळ सुरु झाला. (WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand Match 6th day reserve day Updates from Southampton ground)

कधी पाऊस कधी खराब प्रकाशमान या सर्व व्यत्ययांमुळे 5 दिवसांत सामना पूर्ण होऊ शकला नसल्याने आजचा सहावा राखीव दिवस ही वापरण्यात येणार आहे. मात्र आजच्या वातावरणावर आजच्या दिवशी खेळ होणार का? आणि होणार तर किती ओव्हर्सचा याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान याबाबतच साऊदम्पटनमधून मोठी माहिती समोर आली आहे.

आजचं वातावरण साफ

साऊदम्पटनमधून आज समोर आलेल्या माहितीनुसार आज दिवसभर आकाश साफ राहणार आहे. त्यामुळे पाऊस किंवा खराब प्रकाशमानाचा व्यत्यय येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे इतर दिवशीच्या तुलनेत आजा चांगला आणि संपूर्ण ओव्हर्सचा खेळ खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे. आज संपूर्ण सामना खेळवला गेल्यास विजयी कोण? हा निर्णयही लवकरच समोर येईल.

आतापर्यंतच्या सामन्याचा धावता आढावा

सर्वात आधी न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. भारताला 217 धावांवर ऑलआऊट करुन न्यूझीलंडने 249 धावा केल्या आणि भारतावर 32 रनांची आघाडी मिळवली. त्यानंतर भारत आता आपला दुसरा डाव खेळत असून पाचव्या दिवसाखेर भारताची स्थिती 64 वर 2 बाद अशी आहे. सध्या विराट (8) आणि पुजारा (12) खेळत आहेत.

हे ही वाचा :

WTC Final : ‘सुपरमॅन’ शुभमन, चित्त्यासारखी झेप घेत पकडला झेल, सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

ICC WTC Final : 196 ओव्हर ठरवणार विजेता, जाणून घ्या कोणता संघ होणार विजयी

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

(WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand Match 6th day reserve day Updates from Southampton ground)

Follow Us
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?