AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 2 मिनिटं उशीर झाला असता तर टीम इंडियाच्या हातून गेला असता गॉल कसोटी सामना, कारण की…

भारताने गॉल कसोटी सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवला. पण या सामन्यात दोन मिनिटं उशीर झाला असता तर कदाचित हा सामना गमवण्याची वेळ आली असती. त्याला कारणंही तसंच आहे.

फक्त 2 मिनिटं उशीर झाला असता तर टीम इंडियाच्या हातून गेला असता गॉल कसोटी सामना, कारण की...
फक्त 2 मिनिटं उशीर झाला असता तर टीम इंडियाच्या हातून गेला असता गॉल कसोटी सामना, कारण की...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 19, 2026 | 5:09 PM
Share

India vs Sri Lanka, Galle Test: गॉल कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला 165 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताची पहिल्या डावापासून पकड राहिली होती. त्यामुळे भारतीय संघ विजयी होणार हे पक्कं झालं होतं. पण या कसोटी सामन्यात 2 मिनिटं उशीर झाला असता तर चित्र काही वेगळं असतं. 2 मिनिटात असं काय घडलं असतं की हा भारताच्या हातून हा सामना गेला असता, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. 2 मिनिटं आणि गॉल कसोटी सामन्याचं कनेक्शन काय आहे? भारताने 600व्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला, हे त्या दोन मिनिटांच्या फरकाने हा सामना गमवणं कसं काय शक्य झालं असतं? चला जाणून घेऊयात त्याबाबत…

2 मिनिटं उशीर झाला असता तर..

भारतीय संघाला दोन मिनिटं उशीर आणि सामना विजयाचं गणित काय आहे? त्याचं उत्तर सामना संपल्या संपल्या मिळालं. भारताने गॉल कसोटी सामन्यात विजय मिळवला आणि जोरदार पावसाला सुरूवात झाली. जर भारताने शेवटची विकेट घेण्यास दोन मिनिटं उशीर केला असता तर गॉल सामना पावसामुळे थांबवावा लागला असता. त्यात पाऊस थांबला नसता तर उर्वरित खेळच झाला नसता. त्यामुळे हातातोंडाशी आलेला सामना हातून गेला असता. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ड्रॉ करण्याची वेळ आली असती. इतकंच काय तर सामन्यानंतर होणारं प्रेजेन्टेशन आत करावं लागलं. हा सामना सुरू असताना दुसऱ्या दिवशी पावसामुळे मोठा खंड पडला होता. त्यामुळे हा सामना ड्रॉ होतो की काय? असा विचार क्रीडाप्रेमी करत होते.

काय झालं या सामन्यात?

भारताने पहिल्या डावात 178 धावांची आघाडी घेतल्याने फायदा झाला. त्यात दुसऱ्या डावात 193 धावा केल्या आणि 371 धावा झाल्या. त्यामुळे 372 धावांचं मोठं लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवलं. श्रीलंकेने या धावांचा पाठलाग करताना 206 धावा केल्या आणि डाव आटोपला. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार धनंजय डिसिल्वा आणि सोनल दिनुषा यांनी चिवट खेळी केली. दोघांनी अर्धशतकं ठोकली, पण संघाला विजयाच्या वेशीवर पोहोचवू शकले नाहीत. त्यात मानव सुथार फिरकीमुळे श्रीलंकन संघ अडचणीत आला होता. त्याने दोन्ही डावात मिळून 10 विकेट घेतल्या. देवदत्त पडिक्कलने शतकासह 211 धावा केल्या. त्यामुळे प्लेयर ऑफ द मॅच निवडलं.

Follow Us
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक