Ind Vs ENG : कुणी बॅटिंगने पाहुण्यांचं तोंड बंद केलं तर कुणी फिरकीवर नाचवलं, भारताच्या विजयाचे 5 चेहरे!

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेच्या विजयाची गोष्ट म्हणजे विजयाचे नायक विराट कोहली - चेतेश्वर पुजारा किंवा रहाणे नव्हते तर युवा दमदार खेळाडूंनी टीम इंडियाच्या मालिका विजयात सिंहाचा वाटा उचलला. | India Vs England Test series

Ind Vs ENG : कुणी बॅटिंगने पाहुण्यांचं तोंड बंद केलं तर कुणी फिरकीवर नाचवलं, भारताच्या विजयाचे 5 चेहरे!
भारताच्या मालिका विजयाचे 5 चेहरे....
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 7:31 PM

मुंबई : चेन्नईतली पहिली कसोटी गमावल्यानंतरही टीम इंडियाने कसोटी मालिकेत इंग्लंडला (India Vs England) 3-1 ने पराभूत केले. चेन्नईत खेळलेली दुसरी कसोटी भारताने जिंकली आणि त्यानंतर अहमदाबादमधील (narendra Modi Stadium) दोन्ही कसोटी सामने जिंकले. चौथ्या कसोटी सामन्यात भारताने अवघ्या तीन दिवसांत एक डाव आणि 25 धावांनी विजय मिळविला. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. या कसोटी मालिकेच्या विजयाची गोष्ट म्हणजे विजयाचे नायक विराट कोहली – चेतेश्वर पुजारा किंवा रहाणे नव्हते तर युवा दमदार खेळाडूंनी टीम इंडियाच्या मालिका विजयात सिंहाचा वाटा उचलला. (India Vs England 5 heroes of team India Series Win Ravichandran Ashwin, Axar patel, Rohit Sharma, Rishabh pant, Washington Sundar)

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)

अश्विनने या संपूर्ण मालिकेत पाहुण्या इंग्लंडला आपल्या फिरकीवर नाचवलं. अश्विनने या एकूण 4 टेस्ट मॅचमध्ये 14. 72 सरासरीने एकूण 32 विकेट्स पटकावल्या. अश्विनने या सीरिजमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पार केला. सोबतच अश्विनने चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत आपल्या होमपीचवर खणखणीत शतक लगावलं. अश्विनने या 4 सामन्यांच्या मालिकेत 31. 50 च्या एव्हरेजने 189 धावा केल्या.

अश्विनने या संपूर्ण मालिकेत पाहुण्या इंग्लंडला आपल्या फिरकीवर नाचवलं. अश्विनने या एकूण 4 टेस्ट मॅचमध्ये 14. 72 सरासरीने एकूण 32 विकेट्स पटकावल्या. अश्विनने या सीरिजमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पार केला. सोबतच अश्विनने चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत आपल्या होमपीचवर खणखणीत शतक लगावलं. अश्विनने या 4 सामन्यांच्या मालिकेत 31. 50 च्या एव्हरेजने 189 धावा केल्या.

अक्षर पटेल (Axar patel)

अक्षर पटेलने दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं.त्याने पदार्पणातील सामन्यापासून आपल्या फिरकीने पाहुण्या इंग्लंडला नाचवलं. त्याने या मालिकेतील एकूण 27 विकेट्स घेतल्या. तसेच त्याने एकूण 4 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यासह अक्षर पदार्पणातील मालिकेत 27 विकेट्स घेणारा तिसरा भारतीय ठरला. याआधी टीम इंडियाकडून दिलीप दोशी आणि शिवलाल यादव या दोघांनी अशी कामगिरी केली होती.

रोहित शर्मा (Rohit Sharma)

रोहित शर्मा पुन्हा एकदा भारतीय टीमचा कणा असल्याचं सिद्ध झालं. इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराची बॅट चमकली नाही मात्र रोहितने आपल्या बॅटचा करिश्मा दाखवला. रोहितने चार मॅचमध्ये 345 रन्स ठोकले. ज्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. 57. 50 च्या नेट सरासरीने त्याने हे रन्स ठोकले.

रिषभ पंत (Rishabh Pant)

टीम इंडियाचा विकेट कीपर बॅट्समन रिषभ पंतने बॅटिंग आणि कीपिंगमध्येही जलवा दाखवला. या सिरीजमध्ये 54 च्या सरासरीने त्याने 270 रन्स काढले तर स्टंपच्या मागेही त्याने चमक दाखवली. 13 फलंदाजांना त्याने माघारी धाडलं. पीचने करामत दाखवायला सुरुवात केल्यानंतर त्याने 8 झेल पकडले तर 5 स्टम्पिंग केल्या.

वॉश्गिंटन सुंदर (Washington Sundar)

अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) चौथ्या कसोटीत आपल्या शतकापासून वंचित राहिला. सुंदरला शेपटीच्या फलंदाजांनी साथ न दिल्याने सुंदर आपल्या कसोटीतील पहिल्या शतकापासून अवघ्या 4 धावा दूर राहिला. सुंदरने नाबाद 96 धावांची खेळी केली. तत्पूर्वी त्याने सिरीजमध्ये 181 रन्स केले. सातव्या आणि आठव्या क्रमांकाला येऊन विपरीत परिस्थितीत त्याने हे रन्स केले.

(India Vs England 5 heroes of team India Series Win Ravichandran Ashwin, Axar patel, Rohit Sharma, Rishabh pant, Washington Sundar)

हे ही वाचा :

R Ashwin | फिरकीने कमाल, बॅटिंगने धमाल, अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’

Video | ‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर यांचे अनोखे ‘अर्धशतक’, बीसीसीआयकडून विशेष सन्मान

India vs England 4Th Test | अश्विन-अक्षरने इंग्लंडला लुटलं, 70 पैकी जवळपास 60 विकेट्स दोघांनाच !

ICC Test ranking : इंग्लंडला धूळ चारत टीम इंडिया बनली जगातली नंबर वन टीम

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.