AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात खोळंबा, पाऊस न थांबल्यास पुढे काय?

हा सामना रद्द झाल्यास काय होईल, असा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. पहिल्या सेमीफायनसाठी 10 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यामुळे आज सामना पूर्ण न झाल्यास हा सामना उद्या याच मैदानावर खेळवण्यात येईल.

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात खोळंबा, पाऊस न थांबल्यास पुढे काय?
| Edited By: | Updated on: Jul 10, 2019 | 11:03 AM
Share

लंडन : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसाने खोळंबा घातलाय. भारताने न्यूझीलंडला अत्यंत कमी धावा देण्यात यश मिळवलंय. पण 46.1 षटकात पावसाने खोळंबा घातल्याने सामना थांबवावा लागला. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास काय होईल, असा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. पहिल्या सेमीफायनसाठी 10 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यामुळे आज सामना पूर्ण न झाल्यास हा सामना उद्या याच मैदानावर खेळवण्यात येईल.

सामना पुन्हा खेळवण्यात आला तरी पहिल्यापासून सुरुवात केली जात नाही. भारताने न्यूझीलंडला अत्यंत कमी धावा करु दिल्या आहेत. सामना उद्या झाला तरीही 46.1 षटकापासूनच पुढे सुरुवात होईल. म्हणजेच सामना पुन्हा नव्याने सुरु होणार नाही. 11 जुलैला होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलसाठी 12 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय.

राखीव दिवसाला सामना रद्द झाल्यास पुढे काय?

या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. गुणतालिकेत भारत सध्या 15 गुणांसह अव्वलस्थानी आहे. जर सामना रद्द होऊन भारताला 1 गुण मिळाला तर भारताच्या खात्यात 16 गुण जमा होतील. दुसरीकडे न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यांना एक गुण मिळाला तर त्यांच्या खात्यात  12 गुण जमा होतील. त्यामुळे सर्वाधिक गुणांमुळे भारत सहज फायनलमध्ये पोहोचेल.

या विश्वचषकात पावसाने पहिल्यापासूनच खोळंबा घातलाय. याअगोदरही न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. चार सामने पावसामुळे रद्द झाले होते. परिणामी अनेक संघांना याचा फटका बसला. पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्यास न्यूझीलंडसाठी अत्यंत दुःखद गोष्ट असेल, कारण न खेळताच त्यांना विश्वचषकातील प्रवास इथेच थांबवावा लागेल.

फायलन रद्द झाल्यास पुढे काय?

सेमीफायनल आणि फायनल सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल लावला जातो. पण फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास राखीव दिवसानंतर दोन्ही संघांना ट्रॉफी शेअर करावी लागते.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.