AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात खोळंबा, पाऊस न थांबल्यास पुढे काय?

हा सामना रद्द झाल्यास काय होईल, असा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. पहिल्या सेमीफायनसाठी 10 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यामुळे आज सामना पूर्ण न झाल्यास हा सामना उद्या याच मैदानावर खेळवण्यात येईल.

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात खोळंबा, पाऊस न थांबल्यास पुढे काय?
| Edited By: | Updated on: Jul 10, 2019 | 11:03 AM
Share

लंडन : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसाने खोळंबा घातलाय. भारताने न्यूझीलंडला अत्यंत कमी धावा देण्यात यश मिळवलंय. पण 46.1 षटकात पावसाने खोळंबा घातल्याने सामना थांबवावा लागला. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास काय होईल, असा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. पहिल्या सेमीफायनसाठी 10 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यामुळे आज सामना पूर्ण न झाल्यास हा सामना उद्या याच मैदानावर खेळवण्यात येईल.

सामना पुन्हा खेळवण्यात आला तरी पहिल्यापासून सुरुवात केली जात नाही. भारताने न्यूझीलंडला अत्यंत कमी धावा करु दिल्या आहेत. सामना उद्या झाला तरीही 46.1 षटकापासूनच पुढे सुरुवात होईल. म्हणजेच सामना पुन्हा नव्याने सुरु होणार नाही. 11 जुलैला होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलसाठी 12 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय.

राखीव दिवसाला सामना रद्द झाल्यास पुढे काय?

या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. गुणतालिकेत भारत सध्या 15 गुणांसह अव्वलस्थानी आहे. जर सामना रद्द होऊन भारताला 1 गुण मिळाला तर भारताच्या खात्यात 16 गुण जमा होतील. दुसरीकडे न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यांना एक गुण मिळाला तर त्यांच्या खात्यात  12 गुण जमा होतील. त्यामुळे सर्वाधिक गुणांमुळे भारत सहज फायनलमध्ये पोहोचेल.

या विश्वचषकात पावसाने पहिल्यापासूनच खोळंबा घातलाय. याअगोदरही न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. चार सामने पावसामुळे रद्द झाले होते. परिणामी अनेक संघांना याचा फटका बसला. पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्यास न्यूझीलंडसाठी अत्यंत दुःखद गोष्ट असेल, कारण न खेळताच त्यांना विश्वचषकातील प्रवास इथेच थांबवावा लागेल.

फायलन रद्द झाल्यास पुढे काय?

सेमीफायनल आणि फायनल सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल लावला जातो. पण फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास राखीव दिवसानंतर दोन्ही संघांना ट्रॉफी शेअर करावी लागते.

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.