AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात खोळंबा, पाऊस न थांबल्यास पुढे काय?

हा सामना रद्द झाल्यास काय होईल, असा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. पहिल्या सेमीफायनसाठी 10 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यामुळे आज सामना पूर्ण न झाल्यास हा सामना उद्या याच मैदानावर खेळवण्यात येईल.

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात खोळंबा, पाऊस न थांबल्यास पुढे काय?
| Edited By: | Updated on: Jul 10, 2019 | 11:03 AM
Share

लंडन : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसाने खोळंबा घातलाय. भारताने न्यूझीलंडला अत्यंत कमी धावा देण्यात यश मिळवलंय. पण 46.1 षटकात पावसाने खोळंबा घातल्याने सामना थांबवावा लागला. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास काय होईल, असा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. पहिल्या सेमीफायनसाठी 10 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यामुळे आज सामना पूर्ण न झाल्यास हा सामना उद्या याच मैदानावर खेळवण्यात येईल.

सामना पुन्हा खेळवण्यात आला तरी पहिल्यापासून सुरुवात केली जात नाही. भारताने न्यूझीलंडला अत्यंत कमी धावा करु दिल्या आहेत. सामना उद्या झाला तरीही 46.1 षटकापासूनच पुढे सुरुवात होईल. म्हणजेच सामना पुन्हा नव्याने सुरु होणार नाही. 11 जुलैला होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलसाठी 12 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय.

राखीव दिवसाला सामना रद्द झाल्यास पुढे काय?

या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. गुणतालिकेत भारत सध्या 15 गुणांसह अव्वलस्थानी आहे. जर सामना रद्द होऊन भारताला 1 गुण मिळाला तर भारताच्या खात्यात 16 गुण जमा होतील. दुसरीकडे न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यांना एक गुण मिळाला तर त्यांच्या खात्यात  12 गुण जमा होतील. त्यामुळे सर्वाधिक गुणांमुळे भारत सहज फायनलमध्ये पोहोचेल.

या विश्वचषकात पावसाने पहिल्यापासूनच खोळंबा घातलाय. याअगोदरही न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. चार सामने पावसामुळे रद्द झाले होते. परिणामी अनेक संघांना याचा फटका बसला. पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्यास न्यूझीलंडसाठी अत्यंत दुःखद गोष्ट असेल, कारण न खेळताच त्यांना विश्वचषकातील प्रवास इथेच थांबवावा लागेल.

फायलन रद्द झाल्यास पुढे काय?

सेमीफायनल आणि फायनल सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल लावला जातो. पण फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास राखीव दिवसानंतर दोन्ही संघांना ट्रॉफी शेअर करावी लागते.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.