AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 : सेमीफायनलमध्ये पावसाचा व्यत्यय ? भारतीय संघाचं काय होणार ? रिझर्व्ह-डेचा नियम काय ?

India Final Scenario in T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही आणि अपराजित राहून उपांत्य फेरीतही प्रवेश केला आहे. आता सेमीफायनलमध्ये 27 जूनला भारतीय संघाचा इंग्लंडशी होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

T20 World Cup 2024 : सेमीफायनलमध्ये पावसाचा व्यत्यय ? भारतीय संघाचं काय होणार ? रिझर्व्ह-डेचा नियम काय ?
| Updated on: Jun 26, 2024 | 12:21 PM
Share

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने T20 वर्ल्ड कपमध्ये अक्षरश: खळबळ माजवली आहे. या स्पर्धेत संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने ग्रुप स्टेज आणि नंतर सुपर-8 मध्ये आपले सर्व सामने जिंकून सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. भारतीय संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सुपर-8 च्या गट-1 मध्ये अव्वल स्थानावर राहून या टीमने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये 27 जून रोजी भारतीय संघाचा इंग्लंडशी होणार आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार असून तो पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक उत्सुक आहेत.

सेमीफायनलमध्ये रिझर्व्ह-डे असेल का?

पण भारत वि. इंग्लंड सामना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची काळजी वाढवणारा एक मुद्दा आहे, तो म्हणजे पाऊस. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. जर त्या दिवशी पाऊस पडला आणि उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर ? सेमीफायनलमधील या सामन्यासाठी रिझर्व्ह-डे ठेवण्यात आला आहे का ? सामना रद्द झाल्यास भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडेल का ? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्याबद्दलच जाणून घेऊया…

या वर्ल्डकपमध्ये एक सस्पेन्स आहे. तो म्हणजे, दुसऱ्या सेमीफायनलसाठी आयसीसीने कोणताही रिझर्व्ह डे (राखीव दिवस)ठेवलेला नाही. पण पहिल्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाऊस पडल्यास रिझर्व्ह डे ऐवजी त्या सामन्यासाठी 4 तास 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे, जेणेकरून सामना त्याच दिवशी खेळवला जाईल.

मॅच रद्द झाल्यास पुढे काय ?

27 जून रोजी सेमीफायनलच्या दिवशी गयानामध्ये पावसाची बरीच शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाची सेमीफायनल मॅच पावसामुळे वाहून जाऊ शकते. अशा परिस्थितीत, प्रथम 4 तास 10 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. जर असे झाले नाही तर ग्रुप स्टेजमध्ये अव्वल असलेल्या संघाला फायदा होईल आणि त्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. म्हणजे भारतालाच फायदा होईल. भारतीय संघाने सुपर-8 च्या गट-1 मध्ये अव्वल स्थानी राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत सामना रद्द झाल्यास टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल. तर ग्रुप-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला इंग्लंडचा संघ बाहेर पडेल.

टी20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, व‍िराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुम्राह, हार्द‍िक पंड्या, मोहम्मद सिराज

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं