5

…म्हणून रोहित शर्माने अनुष्काला अनफॉलो केलं!

'हिटमॅन' रोहित शर्माने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘अनफॉलो’ केल्याची माहिती आहे. त्यामुळे टीम इंडियातील अंतर्गत वाद हा आता त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे.

...म्हणून रोहित शर्माने अनुष्काला अनफॉलो केलं!
Follow us
| Updated on: Jul 27, 2019 | 4:48 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात ताटातूट झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विश्वचषकात संघाच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात मतभेद सुरु असल्याची माहिती आहे. त्याच वेळी आता आणखी एक माहिती समोर येत आहे. ‘हिटमॅन’ रोहित शर्माने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘अनफॉलो’ केल्याची माहिती आहे. त्यामुळे टीम इंडियातील अंतर्गत वाद हा आता त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचला आहे.

View this post on Instagram

We failed to deliver as a team when it mattered, 30 minutes of poor cricket yesterday & that snatched away our chance for the cup. My heart is heavy as I’m sure yours is too.The support away from home was incredible.Thank you all for painting most of uk blue wherever we played ??

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

रोहित शर्माने यापूर्वी विराटलाही इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं. यानंतर, ‘एक समजूतदार व्यक्तीने एकेकाळी म्हटलं – सत्याला कधीही खोटेपणा लपवू शकत नाही’, असा मेसेज अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला.

दुसरीकडे, विराट कोहली अजूनही रोहितला फॉलो करतो, पण तो रोहितची पत्नी रितिका सजदेहला फॉलो  करत नाही. तर अनुष्का ही रोहित आणि रितिका दोघांनाही फॉलो करते. रितिका मात्र विराट आणि अनुष्का या दोघांनाही फॉलो करत नाही. रोहित शर्माचे इन्स्टाग्रामवर एक कोटीहून जास्त फोलोवर्स आहेत, तर तो केवळ 95 जणांना फॉलो करतो.

प्रशासक समिती (सीओए) ने मात्र विराट आणि रोहितमधील या वादाला नाकारलं आहे. ‘हे प्रकरण तुम्ही लोकांनी (मीडिया) तयार केलं आहे’, असं सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी पीटीआयला सांगितलं.

2019 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर रोहित आणि विराटमधील हे मतभेद चह्वाट्यावर आले. तसेच, संघात दोन गट झाल्याचंही सांगण्यात येत होतं. तर काही वर्षांपूर्वी रोहित आणि शिखर धवनने विराटशी संबंधित मॅनेजमेंट कंपनीही सोडली होती. त्यामुळे या दोन खेळांडूंमधील वाद हा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

View this post on Instagram

Seal the silly moments ❣️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

Non Stop LIVE Update
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले