AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020: हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जीवंत, दिल्लीला स्पर्धेबाहेर पडण्याची भीती?

आयपीएलमध्ये मंगळवारी खेळवण्यात आलेल्या सनराजयर्स हैदराबादने विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर 88 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.

IPL 2020: हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जीवंत, दिल्लीला स्पर्धेबाहेर पडण्याची भीती?
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 28, 2020 | 3:12 PM
Share

दुबई : इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (Indian Premier League) मंगळवारी खेळवण्यात आलेल्या सनराजयर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर 88 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. तर दिल्लीचा हा या मोसमातील सलग तिसरा पराभव ठरला आहे. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 220 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांसमोर दिल्लीचा डाव 19 षटकात आटोपला. दिल्लीचा संघ 131 धावांवर गारद झाला.

कर्णधार बर्थडे बॉय डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धीमान साहा हे दोघे हैदराबादच्या विजयाचे हिरो ठरले. हैदराबादकडून प्रथम फलंदाजी करताना या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी केली. या दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांची खूप धुलाई केली. 88 धावांनी हा सामना जिंकत हैदराबादच्या संघाने गुणतालिकेत नेट रनरेट वाढवला आहे. तर दुसऱ्या बाजूला गुणतालिकेत गेल्या काही दिवसांपासून पहिल्या-दुसऱ्या स्थानावर असलेला दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यासोबत दिल्लीच्या संघाचा नेट रनरेटदेखील कमी झाला आहे.

प्लेऑफ सामन्यांमध्ये क्वालिफाय होण्यासाठी दिल्लीच्या संघाला पुढील दोनपैकी एक सामना जिंकणे आवश्यक आहे. परंतु दिल्लीच्या संघासाठी ते सोपं नाही. दिल्लीचे पुढील दोन सामने गुणतालिके पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध आहेत. दिल्लीचा संघ पुढील दोन्ही सामने पराभूत झाला तर त्यांचा नेट रनरेट अजून कमी होईल, त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचणे दिल्लीला अवघड जाईल.

दुसऱ्या बाजूला मुंबई आणि बँगलोरचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. त्यांना या तीनपैकी एक सामना जिंकणे आवश्यक आहे. आज मुंबई आणि बँगलोरमध्ये सामना होणार आहे. आज या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरेल. जो संघ पराभूत होईल. त्या संघाकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी अजून दोन सामने शिल्लक असतील.

दरम्यान, लागोपाठ पाच सामने जिंकून पंजाबचा संघदेखील 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थानच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजून संपुष्टात आलेल्या नाहीत. त्यामुळे कालपर्यंत गुणतालिकेत टॉपला असलेल्या दिल्लीच्या संघासमोरची आव्हानं वाढली आहेत.

संबंधित बातम्या

IPL 2020: वर्ल्ड क्लास बॉलरची साहा-वॉर्नरकडून धुलाई, रबाडाचा रथ रोखला; तीन वर्षांपासूनच्या रेकॉर्डला ब्रेक

India Tour Australia | रोहितला काय झालंय हे चाहत्यांना कळू द्या, सुनील गावसकर कडाडले

Australia Tour : सूर्यकुमारकडे निवड समितीचं पुन्हा दुर्लक्ष; हरभजन-मनोज तिवारी BCCI वर संतापले

IPL 2020 : हिटमॅन मैदानावर परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता

(IPL 2020 : Delhi Capitals playoff looks difficult after defeat by Sunrisers hyderabad)

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...