AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 | MIvKXIP : सचिन तेंडुलकरमुळे मुंबई सुपर ओव्हरमध्ये हरली?

क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाही, तोपर्यंत काहीही सांगता येत नाही. याच वाक्याची प्रचिती आयपीएलमध्ये काल खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या सामन्यादरम्यान आली.

IPL 2020 | MIvKXIP : सचिन तेंडुलकरमुळे मुंबई सुपर ओव्हरमध्ये हरली?
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 19, 2020 | 6:15 PM
Share

दुबई : क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाही, तोपर्यंत काहीही सांगता येत नाही. याच वाक्याची प्रचिती आयपीएलमध्ये काल (रविवारी) खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या सामन्यादरम्यान आली. सुरुवातीला मॅच टाय झाली. त्यानंतर पहिली सुपर ओव्हर बरोबरीत सुटली. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने मुंबईवर विजय मिळवला. (IPL 2020 | Sachin Tendulkar suggested to remove boundary count rule from super over that costs Mumbai Indians)

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने 11 धावा केल्या. त्यामुळे पंजाबला 6 चेंडूत 12 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान पंजाबच्या ख्रिस गेल आणि मयंक अग्रवाल या जोडीने 2 चेंडू राखत पूर्ण केलं. पंजाबने 15 धावा केल्या. या विजयासह पंजाबने मुंबईचा विजयीरथ रोखला. परंतु मुंबईचा पराभव आणि पंजाबचा विजय यामध्ये भारताच माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचं विशेष योगदान आहे. या सामन्यात सचिनमुळे मुंबई हरली असं कोणी म्हणालं तर ते पूर्णतः चुकीचं ठरणार नाही.

सर्वांना प्रश्न पडला असेल की, सचिनमुळे मुंबई कशी काय हरली? परंतु खूप कमी लोकांना माहीत आहे की, एक सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवण्यात यावी, अशी आयडिया सचिन तेंडुलकरच्याच डोक्यातून आलेली आहे.

2019 च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना (इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना) टाय झाला होता. त्यानंतर खेळवण्यात आलेली सुपर ओव्हरदेखील टाय झाली. त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी बाऊंड्री (चौकार आणि षटकार) मोजण्यात आल्या.

ज्या संघाने जास्त बाऊंड्री मारल्या तो संघ विजेता. या नियमानुसार इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत विश्वचषक स्वतःच्या नावे केला. परंतु हा नियम अनेकांना पटला नव्हता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलादेखील हा नियम पटला नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकरने (16 जूलै 2019 रोजी) सल्ला दिला की, “जर एक सुपर ओव्हर टाय झाली तर दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात यावी. जोवर सामन्याचा निकाल लागत नाही, तोवर सुपर ओव्हर खेळवण्यात यावी”.

या सामन्यात मुंबईच्या संघाने तब्बल 24 बाऊंड्री लगावल्या होत्या, तर पंजाबच्या संघाने 22 बाऊंड्री लगावल्या होत्या. त्यामुळे आयसीसीचा जुना नियम (जो संघ जास्त बाऊंड्री मारेल तो संघ विजेता) आजही कायम असता तर रविवारी झालेला सामना मुंबईचा संघ जिंकला असता.

संबंधित बातम्या

Super Over | मुंबई-पंजाबची सुपर ओव्हरही टाय, सुपर ओव्हरबद्दल रंजक गोष्टी, 47 वेळा पाठलाग करणाऱ्यांचा विजय

IPL 2020, MI vs KXIP, Super Over : ‘डबल धमाल’, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय

IPL 2020, SRH vs KKR : डेव्हिड वॉर्नरच्या आयपीएलमध्ये वेगवान 5 हजार धावा, विराट कोहलीला पछाडलं

IPL 2020 | ‘दुखापतग्रस्त’ दिल्लीला दिलासा, अमित मिश्राच्या जागी नव्या फिरकीपटूला संधी

(IPL 2020 | Sachin Tendulkar suggested to remove boundary count rule from super over that costs Mumbai Indians)

Follow Us
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.