AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरूच आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने पाच पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे प्लेऑफचा मार्ग किचकट होत जाणार आहे. असं असताना चौथ्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या विधानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?
IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 17, 2026 | 4:02 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आणि सहाव्या जेतेपदाची आस लावली. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सची गाडी रूळावरून घसरली. सलग चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पाचव्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सहज पराभूत केलं. मुंबईने पंजाबसमोर विजयासाठी 196 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. पण पंजाबने 16.3 षटकात 7 गडी गमवून हे आव्हान गाठलं. या सामन्यात मुंबई इंडियन्सचे गोलंदाज पुरते हतबल दिसून आले. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना फोडून काढलं. या पराभवासह मुंबई इंडियन्स संघ तळाशी पोहोचला आहे. नवव्या स्थानावर मुंबई इंडियन्स घसरला आहे. त्यामुळे मुंबईची प्लेऑफचं वाट प्रत्येक पराभवानंतर बिकट होत जाणार आहे. असं असताना चौथ्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने एक मोठं विधान केलं आहे. त्याने खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघाच्या कामगिरीवर निराशा व्यक्त करत सांगितलं की, ‘आम्ही काही कठोर प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील की तसंच ठेवायचं की सर्व सुधारेल अशी आशा करावी? हे काही कठोर प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्यावी लागतील आणि यासाठी जबाबदारी घ्यावी लागेल.’ हार्दिक पांड्याने पुढे सांगितलं की, ‘मला आत्ता जास्त काही बोलायचं नाही. आपल्याला पुन्हा नव्याने विचार करून पाहावं लागेल की आपल्यात कुठे कमतरता आहे. ही वैयक्तिक समस्या आहे, सांघिक समस्या आहे की नियोजनाची समस्या आहे? आपण एकत्र बसून यावर चर्चा करू आणि पुढे काय करता येईल हे ठरवू.’

सूर्यकुमार आणि बुमराहला संघातून वगळणार?

आयपीएल 2026 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सच्या सुमार कामगिरीला काही खेळाडू जबाबदार असल्याचं हार्दिक पांड्याच्या विधानातून दिसून येत आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात कोण प्लेइंग 11च्या बाहेर जाईल याची चर्चा रंगली आहे. कारण जसप्रीत बुमराहला पाच सामन्यात एकही विकेट मिळालेली नाही. तर सूर्यकुमार यादव पूर्णपणे फेल गेला आहे. त्यामुळे या स्टार खेळाडूंना विश्रांती देऊन नवा संघ बांधला जाईल का? असाही प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पण हार्दिक पांड्याच्या वक्तव्यातून पुढच्या सामन्यात काही तरी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Follow Us
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.