AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: सलग दोनदा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाला पाणी पाजल्यानंतर आयर्लंड कर्णधार काय म्हणाला? प्रतिक्रियेची जोरदार चर्चा

भारत आणि आयर्लंड यांच्यात पहिला टी-20 सामना काल पार पडला जो आयर्लंडच्या संघाने जिंकला. आता या विजयानंतर आयर्लंड कर्णधार लॉर्कन टकरने काय प्रतिक्रिया दिली ती पाहा...

IND vs IRE: सलग दोनदा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाला पाणी पाजल्यानंतर आयर्लंड कर्णधार काय म्हणाला? प्रतिक्रियेची जोरदार चर्चा
Lorcan Tucker
| Updated on: Jun 27, 2026 | 10:35 AM
Share

भारत आणि आयर्लंड यांच्यात पहिला टी-20 सामना पार पडला. या मालिकेत दोन सामने खेळवले जाणार असून पहिला सामना काल पार पाडला जो आयर्लंड संघाने जिंकला. आयर्लंड संघाने भारतीय संघाला 34 धावांनी पराभवाचा धक्का दिला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिलाच सामना गमावला. श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंड संघाने 182 धावा केल्या. भारतीय संघाना 148 धावा करता आल्या. एकट्या अभिषेक शर्माने अर्धशतक खेळी खेळली. भारतीय संघाला धुळ चारल्यानंतर आता आयर्लंड कर्णधाराने प्रतिक्रियेत काय सांगितले ते जाणून घ्या…

आयर्लंडच्या पहिल्या डावात, टकरने अर्धशतक झळकावून आपल्या संघाला 182 धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात, टीम इंडियाची सुरुवात खराब झाली आणि पॉवरप्लेमध्ये त्यांनी तीन विकेट गमावल्या. भारताला त्याचे परिणाम भोगावे लागले आणि आयर्लंडच्या संघाने पाहुण्या संघाचा 34 धावांनी पराभव केला. यासह, आयर्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

भारतीय संघाविरुद्ध विजयानंतर आयर्लंड कर्णधार म्हणाला की,”आम्ही जिंकलो तो क्षण खरोखरच खास होता. आम्ही कडवी झुंज दिली, काही कठीण क्षण आले, पण आम्ही आमचा संयम राखला आणि निष्ठेने खेळलो. मला वाटते की भारताने सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली.आमच्यासाठी चांगले फटके खेळणे कठीण होते. काही काळासाठी, हा एक कसोटी सामना असल्यासारखे वाटत होते. मला वाटते की विश्वविजेत्यांना आमच्या भूमीवर हरवणे खूप खास आहे. याचे श्रेय खेळाडूंना आणि क्रिकेट आयर्लंडच्या पडद्यामागील मेहनतीलाही जाते. मला वाटते की पदार्पण करणाऱ्यांनी मोठे धैर्य दाखवले. आम्ही भारताच्या गोलंदाजीतून शिकलो आणि त्यांनी सातत्याने योग्य ठिकाणी गोलंदाजी करण्याची उत्तम क्षमता दाखवली. भारताविरुद्धची मालिका आमच्याच भूमीवर जिंकणे खूप खास असेल.”

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अत्यंत लाजिरवाणी सुरुवात झाली आहे. कोणत्याही फॉरमॅटमध्ये आयर्लंडविरुद्ध पराभव पत्करण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, भारतीय संघाने केवळ टी-20 आंतरराष्ट्रीयच नव्हे, तर एकदिवसीय सामन्यांमध्येही आयर्लंडविरुद्ध एकही सामना गमावला नव्हता.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला