AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | केएल राहुलऐवजी ‘या’ खेळाडूने शिखरसोबत सलामीला यावे, भारताच्या माजी प्रशिक्षकाचा सल्ला

ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसरा टी 20 सामना 6 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे.

India vs Australia 2020 | केएल राहुलऐवजी 'या' खेळाडूने शिखरसोबत सलामीला यावे, भारताच्या माजी प्रशिक्षकाचा सल्ला
| Updated on: Dec 05, 2020 | 5:30 PM
Share

कॅनबेरा : टीम इंडियाने पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय (India vs Australia 2020) मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून केएल राहुल (K L Rahul) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan)सलामीला आले. केएलने सलामीला न येता पाचव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी यावे. तसेच शिखरसोबत सलामीला केएलऐवजी मयंक अगरवालने यावे, असा सल्ला टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी दिला आहे. mayank agarwal open the innings and k l rahul should bat at number five, said sanjay bangar

सलामीसाठी मयंक-शिखर सर्वोत्तम

“टी 20 मालिकेत सलामीला केएलऐवजी मयंक हा सर्वोत्तम पर्याय आहे. रोहित शर्माला दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत सलामीचा मोठा प्रश्न उपस्थित झाला. टीम इंडियाने सलामीसाठी धवनसह मयंकलाच पाठवायला हवे”, असं वक्तव्य संजय बांगर यांनी केलं. बांगर स्टार स्पोर्ट्ससोबत बोलत होते.

पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यात सलामी

मयंकने शिखरसोबत ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यात सलामी केली. या दोन्ही सामन्यात मयंकला अपेक्षित आणि चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. यामुळेच मयंकला तिसऱ्या एकदिवसीय आणि पहिल्या टी 20 सामन्यात संधी मिळाली नाही.

राहुलचं 5 व्या क्रमांकावर महत्वपूर्ण योगदान

“राहुलने 5 व्या क्रमांकावर बॅटिंग करताना टीम इंडियासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. राहुलने पाचव्या क्रमांकावरच फलंदाजसाठी यायला हवं”, असंही बांगर यांनी नमूद केलं.

सलामीला बॅटिंग करत पटकावली ऑरेंज कॅप

केएलने ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र त्याला या क्रमांकावर फार उठावदार फलंदाजी करता आली नाही. तर या विरोधात पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार अर्धशतक लगावलं. केएलने आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) सलामीला येत दमदार कामगिरी केली होती. सलामीला धमाकेदार फलंदाजी करत ऑरेंज कॅप पटकावली होती. आयपीएल स्पर्धेत एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते.

6 डिसेंबरला दुसरा टी 20 सामना

3 टी 20 सामन्यातील दुसरा सामना 6 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा दुसरा सामना ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’ चा असणार आहे. तर टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | बाऊन्सर खेळता येत नसेल तर बदली खेळाडू घेण्याचा हक्कही नाही, गावसकरांची जाडेजावर टीका

India vs Australia 2020 | टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू दुखापतग्रस्त, टी 20 मालिकेला मुकणार

mayank agarwal open the innings and k l rahul should bat at number five, said sanjay bangar

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.