KHO KHO WC : भारतीय महिला संघाने मलेशियाला 100-20 ने नमवलं, उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशशी सामना

खो खो वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारताने सलग तिसरा विजय मिळवला आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात मलेशियाला पराभूत केलं. या सामन्यात भारताने मलेशियाला 100-20 या फरकाने पराभूत केलं. अटॅक आणि डिफेंस या दोन्ही स्तरावर टीम इंडिया सरस ठरली.

KHO KHO WC : भारतीय महिला संघाने मलेशियाला 100-20 ने नमवलं, उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशशी सामना
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 9:53 PM

खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने विजयी घोडदौड कायम ठेवली. तिसऱ्या सामन्यात मलेशियाला अक्षरश: लोळवलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार प्रियांका इंगलेने डिफेंस करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात सहा ड्रीम गुण मिळवले आणि भारताने पहिल्याच डावात पकड मिळवणार हे दाखवून दिलं. दुसऱ्या डावाच भारताने अटॅक करत 38 गुण मिळवले. तिसऱ्या डावात भारताने पुन्हा एकदा 4 ड्रिम गुण मिळवले. तर मलेशियाच्या खात्यात फक्त 14 गुण आले. चौथ्या डावातही भारताने मलेशियाचा डिफेंस मोडून काढला. एकही ड्रीम गुण दिला नाही. इतकंच काय तर जोरदार अटॅक करत 52 गुणांची कमाई केली. त्यामुळे भारताने खूपच मोठा फरक केला . भारताने मलेशियाला 100-20 च्या फरकाने पराभूत केलं. भारताने हा सामना 80 गुणांच्या आघाडीने जिंकला. मलेशिया या पराभवामुळे स्पर्धेतून बाद झाला आहे. या सामन्यात रेश्मा राठोडला तिच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

भारताचे साखळी फेरीतील सर्व सामने संपले आहेत. आता भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशशी भिडणार आहे. टीम इंडियाची या स्पर्धेतील कामगिरी पाहता जेतेपदापासून रोखणं कठीण आहे असंच दिसत आहे. आता बाद फेरीत भारताने अशीच कामगिरी ही अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.

भारतीय महिला संघ: प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर, सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनू, मोनिका, नाझिया बीबी

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.