AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेस्सीच्या टूरवर कोट्यवधींचा खर्च पाहून ऑलिम्पिक विजेत्या अभिनव बिंद्राचं टीकास्त्र, म्हणाला…

लियोनल मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्याने चार शहरांचा दौरा केला. यावेळी कोट्यवधी रूपये खर्च केले गेले. यामुळे ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेत्या अभिनव बिंद्रा यांनी टीकास्त्र सोडलं आहे. भारतीय खेळ संस्कृतीचं उदाहरण देत म्हणाला की...

मेस्सीच्या टूरवर कोट्यवधींचा खर्च पाहून ऑलिम्पिक विजेत्या अभिनव बिंद्राचं टीकास्त्र, म्हणाला...
मेस्सीच्या टूरवर कोट्यवधींचा खर्च पाहून ऑलिम्पिक विजेत्या अभिनव बिंद्राचं टीकास्त्र, म्हणाला...Image Credit source: PTI
| Updated on: Dec 15, 2025 | 6:17 PM
Share

भारत हा क्रिकेटप्रेमी देश आहे. पण फुटबॉलचं वेड काही कमी नाही. भारतात फुटबॉलला प्रोत्साहन मिळेल अशी स्थिती नाही. पण फुटबॉलवरचं प्रेम किती आहे आहे मेस्सी भारतात आल्यावर कळून जातं. त्याच्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला गेला. इतकंच काय तर चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो आणि त्याला बघण्यासाठी मोठी रक्कम मोजली. असं असताना मेस्सीच्या दौऱ्यावर कोट्यवधींचा झालेला खर्च पाहता ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्रा यांनी टीकास्त्र सोडलं आहे. अभिनव बिंद्रा म्हणाला की, या दृश्यामुळे त्यांना शांत दुःखाची भावना निर्माण होते आणि खेळांमध्ये देशाच्या खऱ्या प्राधान्याबद्दल चिंता निर्माण होते. या दरम्यान बिंद्राने मेस्सीवर टीक करत नसल्याचंही स्पष्ट केलं. पण त्याच्या दौऱ्यासाठी केलेली तयारी आणि त्यातून निर्माण गोंधळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

अभिनव बिंद्रा म्हणाला की, ” त्याच्या जवळ जाण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. हे लोकांचे प्रामाणिकपणे कमावलेले पैसे आहेत आणि ते ते त्यांना हवे तसे खर्च करू शकतात. परंतु मला दुःख आहे आणि मला आश्चर्य वाटते की या उर्जेचा आणि गुंतवणुकीचा एक अंशही आपल्या देशात क्रीडा क्षेत्राच्या उभारणीसाठी खर्च करणे शक्य होते का?” अभिनव बिंद्रा पुढे म्हणाला की, ‘ मला व्यावसायिक वास्तव जागतिक ब्रँडिंग आणि आयकॉनचे चुंबकत्व समजते. मी मेस्सीला कोणत्याही प्रकारे दोष देत नाही. त्याने त्याच्या मार्गावर येणारी प्रत्येक संधी मिळवली आहे आणि महानतेची प्रशंसा नैसर्गिक आणि सुंदर आहे. परंतु कौतुकाने आत्मपरीक्षण देखील केले पाहिजे. ‘

अभिनव बिंद्रा पुढे म्हणाला की, ‘मेस्सीसारखे आयकॉन आपल्याला प्रेरणा देतात आणि ती प्रेरणा खूप महत्त्वाची असते. परंतु प्रेरणा हेतूने पूर्ण केली पाहिजे. दीर्घकालीन वचनबद्धतेसह. अशा निवडींसह ज्या आज आपल्याला काय उत्तेजित करतात तेच नव्हे तर उद्या आपल्याला काय बळकट करतील हे प्रतिबिंबित करतात. जर आपण खरोखर मेस्सीसारख्या दिग्गजांचा सन्मान करू इच्छितो तर ते करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग म्हणजे भव्य कृतींद्वारे नाही तर भारतात कुठेतरी एका लहान मुलाला खेळण्यासाठी मैदान आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रशिक्षक आहे आणि स्वप्न पाहण्याची संधी आहे याची खात्री करणे. अशा प्रकारे क्रीडा संस्कृती जन्माला येतात. आणि अशाच प्रकारे वारसा टिकतो.’

मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या....
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?.