AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: दुसऱ्या दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…

IND vs SL 2nd Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट थोडा वादग्रस्तपणे पार पडला, कारण कोलंबोमधील अंधुक प्रकाशातही खेळ चालू ठेवल्याबद्दल यजमान संघ पंचांवर नाराज होता.

IND vs SL: दुसऱ्या दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्...
| Updated on: Aug 25, 2026 | 10:31 AM
Share

IND vs SL Test Series: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट थोडा वादग्रस्तपणे पार पडला, कारण कोलंबोमधील अंधुक प्रकाशातही खेळ चालू ठेवल्याबद्दल यजमान संघ पंचांवर नाराज होता. भारताने आपला पहिला डाव ५०३/९ धावांवर घोषित केला आणि दुसऱ्या दिवशी काही षटके शिल्लक असताना श्रीलंका फलंदाजीसाठी मैदानात उतरली. मात्र, प्रसिद्ध कृष्णाने प्रथम लाहिरू उदाराला बाद केले आणि दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर मानव सुथारने प्रभात जयसूर्याला पायचीत (LBW) केले. बाद होण्याच्या काही चेंडूंआधी मैदानातील पंचांनी प्रकाश तपासला, पण खेळ चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचे दोन्ही फलंदाज, जयसूर्या आणि कामिल मिश्रा यांनी आपली नाराजी व्यक्त केली, पण पंचांनी आपला निर्णय बदलला नाही.

पॅव्हेलियनमध्ये परतताना जयसूर्या स्पष्टपणे नाराज दिसत होता आणि तो वारंवार पंचांकडे मागे वळून पाहत होता. श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यावर त्याने आपले ग्लोव्हज फेकून दिले. ‘प्रभात जयसूर्याकडे बघा, त्याच्या रागातून जणू वाफा निघत आहेत,’ असे मांजरेकर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर म्हणाले.

ध्रुव जुरेलने नाबाद ११५ धावा करून भारताला आपला पहिला डाव ५०३/९ वर घोषित करण्यास मदत केली आणि दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेला ८/२ वर रोखले. यजमान संघ ४९५ धावांनी मागे आहे. सलामीवीर लाहिरू उदारा (१) आणि प्रभात जयसूर्या (२) यांना प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी बाद केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कामिल मिश्रारा (५ नाबाद) खेळपट्टीवर होता.

यापूर्वी,ध्रुव जुरेलने १७७ चेंडूंमध्ये नाबाद ११५ धावा केल्या. हे त्याचे दुसरे शतक होते, ज्यात नऊ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. मुसळधार पावसामुळे पंचांनी चहापानाची वेळ लवकर जाहीर केली, तेव्हा भारताची धावसंख्या ८ गडी बाद ४७५ होती. दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात भारताने ऋषभ पंत (६३) आणि मानव सुतार (१८) यांनी आपली विकेट गमावली. पंत आणि जुरेल यांनी सातव्या विकेटसाठी ११२ मौल्यवान धावा जोडल्या होत्या.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला