AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच

एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच (Airtel's fantastic recharge plan, insurance cover with high speed data in just Rs 300)

एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच
एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच
| Updated on: Mar 01, 2021 | 7:29 PM
Share

नवी दिल्ली : एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या एक से बढकर एक प्रीपेड प्लान आहेत. या सर्व प्लानमध्ये ग्राहकांना ओटीटी अॅपच्या सबस्क्रिप्शनपासून हाय स्पीड डेटा दिला जात आहे. परंतु कंपनीचा एक प्लान असादेखील आहे ज्यात वापरकर्त्यांना 4 लाख रुपयांचा जीवन विमा मिळेल. चला एअरटेलच्या या प्रीपेड योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. (Airtel’s fantastic recharge plan, insurance cover with high speed data in just Rs 300)

एअरटेलचे जीवन विमा प्लान

एअरटेलच्या या प्लानची किंमत 279 रुपये आहे. हा प्रीपेड प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना एचडीएफसी बँकेकडून 4 लाख रुपयांचा जीवन विमा मिळेल. विशेष गोष्ट ही आहे की, लाईफ इन्शुरन्ससाठी कोणत्याही प्रकारच्या पेपरवर्कची किंवा वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नसते. इतर सेवांमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटासह 100 एसएमएस मिळतील. तसेच, वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करु शकतात. या व्यतिरिक्त ग्राहकांना अमेझॉन प्राईम, एअरटेल एक्स्ट्रीम आणि विंक म्युझिकची सदस्यता मिळेल.

एअरटेलला केंद्र सरकारचा झटका

काही वेळापूर्वी केंद्र सरकारने 5 जी नेटवर्कबाबत मोठे विधान केले होते. सरकारच्या म्हणण्यानुसार यंदा देशात 5 जी रोलआऊट होणे शक्य नाही. याची सुरुवात 2022 पर्यंत भारतात होऊ शकते. संसदीय समितीच्या अहवालानुसार पुढील महिन्यांनंतर आणखी एक स्पेक्ट्रम लिलाव होणार आहे. त्यानंतरच पुढच्या वर्षापर्यंत 5 जी भारतात रोलआऊट करता येईल. शात 5 जी सेवा लवकरात लवकर आणणार असल्याची एअरटेलने 23 फेब्रुवारी रोजी घोषणा केली होती. या योजनेंतर्गत कंपनीला 5 जी सेवेत रिलायन्स जिओबरोबर स्पर्धा करायची आहे. एअरटेलच्या निवेदनानुसार, कंपनी आपल्या नेटवर्क विक्रेते आणि डिव्हाइस भागीदारांद्वारे क्वालकॉमच्या 5 जी आरएएन प्लॅटफॉर्मचा उपयोग ग्राहकांना करून देणार आहे.

मुकेश अंबानींनाही झटका बसण्याची शक्यता

संसदीय समितीच्या अहवालानुसार रिलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अंबानी यांच्या योजनांनाही धक्का बसू शकतो. यापूर्वी मुकेश अंबानी म्हणाले होते की जिओ 2021 च्या उत्तरार्धात भारतात 5 जी सेवा सुरू करेल. अंबानींच्या निवेदनानुसार जिओ 5 जी सेवेमध्ये आघाडीवर असेल. तर दुसरीकडे, एअरटेलच्या वतीने यावर्षी हैदराबादमधील व्यावसायिक नेटवर्कवर 5 जी सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्या एअरटेल आणि जिओने 5 जीसाठी तयारी पूर्ण केली आहे. या दोन्ही कंपन्या केवळ सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. (Airtel’s fantastic recharge plan, insurance cover with high speed data in just Rs 300)

संबंधित बातम्या

ना Apple, ना Xiaomi, OnePlus, वर्षभरात या मोबाईलची सर्वाधिक विक्री

WhatsApp Privacy Policy : दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला दिलेली मुदत वाढवली, आता या तारखेला होणार सुनावणी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.