AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lost Mobile Tracking System : आता मोबाईल चोरट्यांची नाही खैर, अवघ्या काही मिनिटांतच खल्लास खेळ!

Lost Mobile Tracking System : आजपासून सरकारच मोबाईल चोरट्यावर मोर होणार आहे. मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काही मिनिटांतच त्याची माहिती मिळविता येणार आहे. आज, 17 मेपासून ही यंत्रणा सुरु होत आहे.

Lost Mobile Tracking System : आता मोबाईल चोरट्यांची नाही खैर, अवघ्या काही मिनिटांतच खल्लास खेळ!
| Updated on: May 17, 2023 | 3:49 PM
Share

नवी दिल्ली : भारतात सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चोरीच्या (Mobile Theft) अनेक घटना घडतात. तर काही जणांना विसरभोळेपणाचा फटका बसतो. महागडे स्मार्टफोन गमावण्याच्या घटना देशात नित्याच्याच आहेत. हरविल्याची तक्रार दिल्यानंतर पण तो लागलीच मिळण्याची कसरत करावी लागते. पण आता हे चित्र बदलणार आहे. आजपासून सरकारच मोबाईल चोरट्यावर मोर होणार आहे. मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काही मिनिटांतच त्याची माहिती मिळविता येणार आहे. आज, 17 मेपासून ही यंत्रणा सुरु होत आहे. मोबाईल ट्रेसिंग सिस्टिम (Lost Mobile Tracking System) आजपासून सुरु होणार. केंद्र सरकारने (Central Government) त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या यंत्रणेमुळे तुमचा हरवलेला, चोरलेला मोबाईल असा पटकन सापडणार आहे..

महाराष्ट्रासह या राज्यात प्रयोग केंद्र सरकार ही निगराणी प्रणाली (Tracking System) आजपासून सुरु करणार आहे. या यंत्रणेमुळे देशभरातील मोबाईलधारकांना मोबाईल चोरीला गेल्यास, हरवल्यास मोबाईल ब्लॉक करण्याची सुविधा मिळेल. मोबाईल कुठे आहे, त्याची माहिती मिळेल. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बॉडी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (CDOT) काही दूरसंचार मंडळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर यासाठीची उपकरणे बसविणार आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक आणि ईशान्य क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरु होत आहे.

मोबाईल करता येईल ब्लॉक देशभरात ही प्रणाली लवकरच कार्यान्वीत होईल. सीआयआयआर प्रणाली 17 मे पासून देशभरातील काही ठिकाणी सुरु होत आहे. सीडॅकचे मुख्य कार्यपालक अधिकारी आणि चेअरमन राजकुमार उपाध्याय यांनी देशात कधी ही सेवा सुरु होईल याविषयीची निश्चित तारखेविषयी अधिकृत माहिती दिली नाही. येत्या तीन महिन्यात संपूर्ण देशात ही प्रणाली सुरु होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रणालीमुळे ग्राहक, मोबाईल वापरकर्ते मोबाईल फोन ब्लॉक अथवा ट्रॅक करु शकतात. सीडॅकने मोबाईल फोन शोधण्यासाठी पूर्वीच्याच प्रणालीत काही बदल केले असून त्यात काही खास फिचर्स जोडले आहेत.

चोरटे पकडले जातील भारतात मोबाईल उपकरणांच्या विक्रीपूर्वी आंतरराष्ट्रीय मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी (आयएमईआय IMEI-15 अंकी संख्या) हा क्रमांक असणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. मोबाईल नेटवर्ककडे हा IMEI-15 अंकी क्रमांक असेल. त्यामुळे मोबाईल चोरी झाल्यावर नेटवर्कवरुन त्याची माहिती मिळेल. तसेच मोबाईल चोरीच्या घटनांना आळा बसेल. या यंत्रणेमुळे मोबाईल चोरटे लवकर पकडले जातील. तसेच मोबाईल हरवल्यास, विसरल्यास त्याचा थांगपत्ता लावता येईल. पोलिसांना पण या यंत्रणेमुळे चोरट्यांचा शोध घेणे सोपे होईल.

CEIR Portal केंद्र सरकारने CEIR Portal सुरु केले आहे. या पोर्टलवर हरवलेला, विसरलेला, चोरलेल्या स्मार्टफोनचे ट्रॅकिंग करता येईल. या यंत्रणेची चाचपणी सुरुवातीला काही राज्यात आजपासून करण्यात येत आहे. आता देशभरातील मोबाईलधारकांना त्याचा फायदा होईल. CEIR पोर्टलवर लॉगिन करुन तुम्हाला हरवलेला मोबाईल ब्लॉक करता येईल. पण त्यासाठी FIR ची कॉपी आणि मोबाईलचा तपशील लागेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.