AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरेरे.. फोनची बॅटरी लगेच होत्ये ढुस्स…? ही ॲप्स खातात तुमची बॅटरी, ‘या’ उपायांनी जास्त काळ चालेल बॅटरी

Battery Draining Apps : तुमच्या मोबाईलमधील काही ॲप्समुळे फोनची बॅटरी वेगाने संपू शकते. ती ॲप्स कोणती हे जाणून घेऊया.

अरेरे.. फोनची बॅटरी लगेच होत्ये ढुस्स...? ही ॲप्स खातात तुमची बॅटरी, 'या' उपायांनी जास्त काळ चालेल बॅटरी
Image Credit source: freepik
| Updated on: Mar 29, 2023 | 7:56 AM
Share

नवी दिल्ली : आजकाल सर्वजण स्मार्टफोन (smartphone) वापरत असतात. फोन पुन्हा पुन्हा चार्ज (charging) करायची वेळ येऊ नये यासाठी आपल्या फोनची बॅटरी (mobile battery) दीर्घकाळ चालणारी असावी, अशी प्रत्येक युजरची इच्छा असते. पण तुमची इच्छा नसतानाही फोनची बॅटरी लवकर संपत असेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे एकतर तुमचा फोन किंवा तुमच्या फोनची बॅटरी खराब झाली आहे.

दुसरं कारण म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये अशी अनेक ॲप्स (apps) असतात, जी बॅटरीचा सर्वाधिक वापर करतात, त्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते. आज आपण अशा काही ॲप्सबद्दल जाणून घेऊया, जे मोबाईलची बॅटरी जास्तीत जास्त वापरण्यासाठी ओळखले जातात.

रिसर्च फर्म pCloud ने नुकताच डेटा गोळा केला आहे, त्यामध्ये स्मार्टफोनमधील कोणते ॲप्स सर्वात जास्त बॅटरी वापरतात याची माहिती दिली आहे. आपल्या रोजच्या वापरातील अनेक ॲप्सचा त्यात समावेश आहे. तुम्हीसुद्धा ही ॲप्स वापरता का ते जाणून घ्या.

1) Uber

2) Fitbit

3) Facebook

4) Skype

5) Instagram

6) Airbnb

7) Bumble

8) Tinder

9) WhatsApp

10) Snapchat

फोनमधील अशा ॲप्समुळे केवळ बॅटरीचा वापर वाढतो असे नाही तर इतर काही कारणांमुळे फोनची बॅटरी झपाट्याने कमी होते.

बॅटरी कमी होण्याचे असू शकते कारण

जर तुम्ही फोनमध्ये ब्लूटूथ, जीपीएस, हाय रिफ्रेश रेट, नेव्हिगेशनसाठी लोकेशन, व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी यूट्यूब इत्यादी वापरत असाल तर या गोष्टींमुळे फोनची बॅटरी पुन्हा पुन्हा संपू शकते. त्यामुळे फोन चार्ज करण्यासाठी वारंवार चार्ज करावा लागू शकतो.

मोबाईल चार्जिंग लावताना काय काळजी घ्यावी ?

– मोबाईल कधीही रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नका. अनेकजण मोबाईल चार्जिंगला लावून झोपतात. त्यामुळे मोबाईल ओव्हरहिट अर्थात गरम होतो आणि त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते.

– मोबाईल नेहमी त्या कंपनीच्या चार्जरनेच चार्ज करा. अन्य कंपनीचे चार्जर वापरल्यामुळे तुमचा फोन हळूहळू चार्ज होतोच, शिवाय बॅटरीला धोका निर्माण होतो.

– मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोनवर अजिबात बोलू नका. स्पीकर फोन ऑन करुनही बोलू नका. ते अत्यंत धोकादायक आहे. शिवाय चार्जिंग करताना मोबाईलवर व्हिडीओ बघणे किंवा गेम खेळणंही टाळा.

– चार्जिंगला लावल्यानंतर मोबाईल गरम होत असेल तर संबंधित मोबाईल कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तपासून घ्या. त्यामुळे बॅटरीचे नुकसान होऊ शकतं.

– मोबाईल संपूर्ण चार्ज झाल्यानंतर त्याचा चार्जर काढून ठेवा. मोबाईल 80 टक्के किंवा 90 टक्केच चार्ज आहे म्हणून तो दिवसभर चार्जिंगलाच लावून ठेवू नका.

– मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी, बॅटरी किमान 20 दिवसातून एकदा पूर्णत: डिस्चार्ज होऊ द्या. त्यानंतर पूर्ण चार्ज करा.

– आवश्यकता नसेल तेव्हा मोबाईल स्वीच ऑफ करुन ठेवा. उदाहरणार्थ झोपताना, किंवा मीटिंगमध्ये असाल तेव्हा. त्यामुळे मोबाईलची बॅटरी वाया जाणार नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.