AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 20 रुपयांत देखील एक्टीव्ह ठेवू शकता Jio, Airtel, Vi चे सिम, काय आहे फॉर्म्युला जाणा

TRAIच्या नियमानुसार तुम्ही केवळ २० रुपये खर्च करुन देखील तुमचा नंबर दीर्घकाळापर्यंत बंद होण्यापासून वाचवू शकता. चला, तर पाहूयात ट्रायच्या या संदर्भात काय गाईडलाईन आहेत.

अवघ्या 20 रुपयांत देखील एक्टीव्ह ठेवू शकता Jio, Airtel, Vi चे सिम, काय आहे फॉर्म्युला जाणा
file photos
| Updated on: Apr 27, 2026 | 8:21 PM
Share

जर तुम्ही तुमच्या प्रीपेड मोबाईल नंबरला ९० दिवसांहून जास्त वेळ रिचार्ज केले नाही तर आणि नंबर इनएक्टीव्ह ठेवला तर टेलिकॉम कंपन्या तुमचा नंबर अन्य युजरला अलॉट करु शकतात. एकदा सिम बंद झाल्यावर आणि कोणा दुसऱ्याला नंबर अलॉट झाल्यानंतर तुमच्या हातात काही राहात नाही. तुम्ही त्या नंबरला पुन्हा तुमच्या नावावर करु शकत नाही.मात्र, आता TRAI च्या नव्या नियमानुसार केवळ २० रुपयात तुम्ही तुमचा नंबर कार्यरत ठेवू शकता. कसे ते पाहूयात….

जुलै २०२४ पासून खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लान महाग केले आहेत. ज्यामुळे दोन सिम वापरणारे बहुतांशी युजर त्यांचा सेकेंडरी नंबर रिचार्ज करु शकत नाहीत. मात्र, तुमच्याकडेही एखादा सेकेंडरी नंबर असेल, ज्याला तुम्ही कमी खर्चात एक्टीव्ह ठेवू इच्छीत आहात तर तुम्हाला केवळ २० रुपये खर्च करावे लागणार आहेत. म्हणजे केवळ २० रुपये खर्च करुन तुम्ही तुमचा Jio, Airtel वा Vodafone Idea चा नंबर दीर्घकाळ सक्रीय ठेवू शकता.

काय आहे फॉर्म्युला ?

दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, जर कोणत्या नंबरला ९० दिवसांपर्यंत वापरले गेले नाही वा रिचार्ज केला नाही आणि त्यात २० रुपयांचे बॅलन्स असेल तर टेलिकॉम ऑपरेटर २० रुपये कापून पुढील ३० दिवसांपर्यंत नंबर एक्टीव्ह ठेवतील. जर तुमच्याकडे असा कोणताही सेकेंडरी क्रमांक आहे, ज्याला तुम्ही कमी वापरता वा वारंवार रिचार्ज करु इच्छीत नाही,तर त्यात २० रुपयांचा बॅलन्स ठेवावा. असे केल्याने तुमचा नंबर पुढील अतिरिक्त ३० दिवसापर्यंत एक्टीव्ह राहू शकतो. म्हणजे १२० दिवसांपर्यंत नंबर बंद होणार नाही.

याशिवाय तुम्ही तुमच्या नंबरला जिओ, एअरटेल वा व्होडाफोनच्या वॉईस ओन्ली वाल्या स्वस्तातल्या प्लानसोबत रिचार्ज करु शकता. असे केल्याने तुमच्या नंबरवर कॉलिंगच्या सोबत इनकमिंग आणि आऊट गोईंग एसएमएसची सुविधा देखील मिळेल. खाजगी टेलिकॉम कंपन्या ८४ दिवसांपासून ३६५ दिवसांपर्यंत व्हॉईस ओन्ली प्लानची ऑफर करत असतात.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...