AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किशोर कुमार यांच्या बंगल्यामध्ये सुरू होणार विराट-अनुष्काचे रेस्टॉरंट; 5 वर्षाचा झाला करार; चाहत्यांना उत्सुकता

भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांकडून खवय्यांसाठी मोठी गोष्ट घेऊन येत आहेत. विराटने हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला अभिनेता-गायक किशोर कुमार (Actor singer Kishor kumar) यांच्या मालकीचा असलेला गौरी कुंज बंगला आपल्या रेस्टॉरंटसाठी भाडोत्री घेतला आहे. आणि थोड्याच दिवसात तो त्या रेस्टॉरंटचे उद्घाटनही करणार आहे.

किशोर कुमार यांच्या बंगल्यामध्ये सुरू होणार विराट-अनुष्काचे रेस्टॉरंट; 5 वर्षाचा झाला करार; चाहत्यांना उत्सुकता
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 02, 2022 | 8:00 AM
Share

मुंबईः भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांकडून खवय्यांसाठी मोठी गोष्ट घेऊन येत आहेत. विराटने हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला अभिनेता-गायक किशोर कुमार (Actor singer Kishor kumar) यांच्या मालकीचा असलेला गौरी कुंज बंगला आपल्या रेस्टॉरंटसाठी भाडोत्री घेतला आहे. आणि थोड्याच दिवसात तो त्या रेस्टॉरंटचे उद्घाटनही करणार आहे. विराट कोहलीने किशोर कुमार यांचा जो बंगला भाडोत्री घेतला आहे तो मुंबईतील जुहूमध्ये आहे. गौरी कुंज हा बंगला विराट कोहली आपल्या बहुचर्चित असलेली रेस्टॉरंट चेन ‘One8 Commune’साठी वापरणार आहे. विराट आणि अनुष्काच्या या रेस्टॉरंटच्या बातमीमुळे या दोघांच्याही चाहत्यांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.

विराट आणि अनुष्काच्या या रेस्टॉरंटच्या बातमीमुळे चाहत्यांना तर उत्सुकता आहेच मात्र विराटच्या या रेस्टॉरंटच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

जर्सी क्रमांक ’18’

भारतीय संघाचा माजी कर्णधार असलेल्या विराटने आपल्या एक रेस्टॉरंटचे नाव ‘One8 Commune’ ठेवले आहे. हे नाव ठेवण्यापाठीमागे त्याचा क्रिकेट जगतातील त्याच्या जर्सी क्रमांक ’18’ वरून हे नाव ठेवले आहे. विराट कोहलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून आपल्या नवीन रेस्टॉरंटच्या उद्घाटनाबाबतही ही माहिती दिली आहे.

रेस्टॉरंटची साखळी

विराट कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘जुहू, मुंबई येथे येत आहे. विराट कोहलीच्या ‘वन8 कम्युन’ या रेस्टॉरंटची साखळी कोलकाता, पुणे आणि क्रिकेटच्या होम टाऊन दिल्लीमध्ये सुद्धा आहे.

बीएमसीची नोटीस

किशोर कुमार यांच्या जुहू येथील ‘गौरी कुंज’ या बंगल्यामध्ये पूर्वी ‘बी मुंबई’ नावाचे एक रेस्टॉरंट होते. ते काही कारणामुळे बंद झाले आहे. किशोर कुमार यांच्या याच बंगल्याला काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम नियमांविरुद्ध काम केल्याच्या कारणांवरुन नोटीस देण्यात आले होते अशीही माहिती आहे.

रेस्टॉरंटची उत्सुकता…

महानगरपालिकेच्या नोटीसमुळे रेस्टॉरंट मालकानेही बंगल्याचा काही भाग तोडून तो दुरुस्त केला होता. तर आता विराट कोहलीने पाच वर्षांसाठी घेतला असून त्यामध्ये विराट आणि अनुष्काचे रेस्टॉरंट आता कधीही उघडण्यास तयार आहे.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?