AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे मिळाला होता कोहिनूर हिरा? जाणून घ्या कोहिनूर हिऱ्याचा इतिहास

कोहिनूर हिऱ्याबद्दल माहित नाही अशी क्वचित एखादी व्यक्ती असेल. कोहिनूर हिरा जगभरात प्रसिद्ध आहे. हा हिरा सध्या इंग्लंडमध्ये आहे. कोहिनूर हा पारशी शब्द आहे ज्याचा अर्थ प्रकाशाचा पर्वत असा होतो. हा कोहिनूर हिरा कुठे मिळाला आणि तो इंग्लंडला कसा गेला ते जाणून घेऊ.

कुठे मिळाला होता कोहिनूर हिरा? जाणून घ्या कोहिनूर हिऱ्याचा इतिहास
| Edited By: | Updated on: Jan 04, 2025 | 4:25 PM
Share

कोहिनूर हिऱ्याचे नाव घेताच अनेकांना एक खंत वाटते की हा अमूल्य हिरा भारतामध्ये होता तो आता इंग्लंडमध्ये आहे. कोहिनूर हिऱ्याचा स्वतःचा इतिहास आहे ज्याचा प्रवास खूप मोठा आहे. त्याची कहाणी केवळ इंग्रजांनी भारतातून इंग्लंडच्या राणीला मुकुट हस्तांतरित करण्यापूर्ती मर्याद नाही. कोहिनूर हिऱ्याचे अनेक मालक होते आणि त्यानंतर तो ब्रिटनमध्ये पोहोचला पण फार कमी लोकांना कोहिनूर हिऱ्याबद्दल पूर्ण माहिती आहे. कोहिनूर हिऱ्याच्या बाबतीत एक विशेष गोष्ट म्हणजे हा हिरा कधीही विकला गेला नाही किंवा विकत घेतला गेला नाही तर हा हिरा प्रत्येक वेळी कोणीतरी भेट म्हणून दिला आहे किंवा तो काही युद्धांमध्ये जिंकला आहे.

इतिहासातून आणि बातम्यांमधून कोहिनूर हिऱ्याबद्दल अनेकदा माहिती मिळाली आहे. पण त्याचा खरा मालक कोण होता याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जाणून घेऊया ऐतिहासिक हिऱ्या बद्दलच्या त्या गोष्टीच्या फार कमी लोकांना माहिती आहेत.

कोहिनूर हिरा पहिल्यांदा कुठे आणि कोणी शोधला?

कोहिनूर हिरा भारतातच सापडला. हा हिरा सुमारे 800 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील गोलकोंडा खाणीत सापडला होता. या दुर्मिळ हिऱ्याचे वजन 186 कॅरेट होते मात्र नंतर हा हिरा अनेक वेळा कोरला गेला आणि त्याचे वजन कमी झाले. असे असले तरी देखील आजही कोहिनूर हा जगातील सर्वात मोठा कटिंग केलेला हिरा मानला जातो. 13 फूट खोलवर सापडलेला कोहिनूर चा पहिला मालक काकतिया राजवंशातील होता. हा अनमोल हिरा त्यांची कुलदेवता भद्रकालीच्या डाव्या डोळ्यात त्याकाळी बसवण्यात आला होता.

किती लोकांकडे होता कोहिनूर हिरा?

चौदाव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने काकतीयांकडून हा हिरा लुटला होता. पानिपतच्या युद्धात मुगल शासक बाबरने आग्रा आणि दिल्लीचे किल्ले ताब्यात घेतले आणि हा हिराही आपल्या सोबत नेला. 1738 मध्ये इराणचा शासक नादिर शहा यांनी मुघलांचा पराभव करून या हिऱ्यावर हक्क सांगितला आणि अहमद शहाकडून तो हिरा हिसकावून घेतला आणि तो स्वतः सोबत नेला. नादिर शहाने मयूर सिंहासनही लुटले आणि त्यात हा हिरा जडवला. नादिर शहाच्या हत्ये नंतर त्याचा नातू शाहरुख मिर्झा याला हिरा वारसा म्हणून मिळाला आणि त्याने अफगाण शासक अहमदशहा दुर्राणी यांना कोहिनूर भेट म्हणून दिला. 1813 मध्ये महाराजा रणजीत सिंह यांनी शुजा शाह यांच्याकडून हिरा घेतला आणि तो भारतात परत आणला.

हिरा ब्रिटिशांकडे कसा गेला?

1849 मध्ये शिख आणि ब्रिटिश यांच्यात दुसरे युद्ध झाले. या युद्धात शिख साम्राज्याचा अंत झाला. ब्रिटिशांनी महाराजा गुलाबसिंग यांच्या सर्व मालमत्तेसह कोहिनूर हिरा ब्रिटन मधील राणी व्हिक्टोरियाला सुपूर्त केला. 1850 मध्ये हा हिरा बकिंगहॅम पलेसमध्ये आला आणि डच फर्म कोस्टर ने तो हिरा कोरून राणीच्या मुकुटामध्ये ठेवला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने ही कोहिनूर हिऱ्यावर दादा केला आहे. सध्या हा हिरा लंडनमध्ये असून तो भारतात परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.