AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Service: 1 ऑ़क्टोबरपासून एकदम सैराट.. कामे होतील सुपर फास्ट..

Service: 1 ऑ़क्टोबरपासून देशातील टेलिकॉम क्षेत्रात क्रांती येणार आहे. त्याचा झंझावात तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे..

Service: 1 ऑ़क्टोबरपासून एकदम सैराट.. कामे होतील सुपर फास्ट..
आता 5G चं वारं Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 25, 2022 | 8:35 PM
Share

नवी दिल्ली : भारतात येत्या 1 ऑ़क्टोबरपासून टेलिकॉम क्षेत्रात (Telecom Sector) क्रांती येणार आहे. त्याचा झंझावात तुमच्या मोबाईलमध्ये (Mobile) जाणवणार आहे.आता आम्ही कोणत्या क्रांतीची गोष्ट करतोय याचा अंदाज तुम्हाला एव्हाना आला असेल. तर देशात 5G चं वारं आलं आहे. त्याची सुरुवात 1 ऑक्टोबरपासून होत आहे.

National Broad Brand Mission ने याविषयीची माहिती ट्विट करुन दिली आहे. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय मोबाईल काँग्रेसमध्ये 5जी सेवा सुरु करणार आहेत. ट्वीट नुसार, डिजिटल ट्रांसफॉर्मेशन आणि कनेक्टिविटीला नवीन आयाम देण्याचा प्रयत्न होणार आहे.

1 ऑ़क्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञानांचा मेळा असणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये 5जी सर्व्हिसचे उद्धघाटन करतील. म्हणजे देशात 5G सेवेचा श्रीगणेशा पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. ही एका क्रांतीपेक्षा कमी गोष्ट नाही. या सेवेमुळे भारत जगात विकसीत राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसेल.

दूरसंचार विभागाने (DoT) इंडिया आणि सेल्युलर ऑपरेशन्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) यांच्या संयुक्त उपक्रमातून मोबाईल काँग्रेसचे आयोजन करण्यात येते. इंडिया मोबाईल काँग्रेस केवळ भारतातच नाही तर आशियातील सर्वात मोठी दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञानाचा मंच असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे.

केंद्रीय IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अत्यंत कमी वेळेत केंद्र सरकारने 5जी सेवेचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या 80 टक्के क्षेत्र व्यापण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. उत्तर भारतातून ही योजना मजबूत होईल.

पहिल्या टप्प्यात भारतातील जवळपास 13 शहरात 5जीची सेवा सुरु करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेल एका महिन्याच आतच सर्वदूर 5जीची सेवा सुरु करणार असल्याची चर्चा आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत काही प्रमुख शहरात कंपनी 5जीची सेवा सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे.

तर आघाडीची कंपनी रिलायन्स जिओनेही देशात 5जी नेटवर्कमध्ये छापा सोडण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनीने क्वालकॉम या कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. एवढंच नाही तर कंपनी गूगल क्लाऊड विकसीत करण्यसाठीही प्रयत्न करत आहे.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली