AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शत्रूचा झटक्यात खात्मा, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेला मूलमंत्र काय?

आचार्य चाणक्य यांना कौटिल्य तसेच विष्णुगुप्त या नावानेही ओळखलं जात. चाणक्य यांच्या नीती तसेच त्यांनी दिलेले संदेश आजही तेवढेच महत्त्वाचे मानले जातात.

शत्रूचा झटक्यात खात्मा, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेला मूलमंत्र काय?
acharya chanakya
| Edited By: | Updated on: May 15, 2025 | 7:11 PM
Share

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना कौटिल्य तसेच विष्णुगुप्त या नावानेही ओळखलं जात. चाणक्य यांच्या नीती तसेच त्यांनी दिलेले संदेश आजही तेवढेच महत्त्वाचे मानले जातात. त्यांनी केलेलं मार्गदर्शन फक्त प्रशासन आणि राजकारण यातच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनासाठीही फार उपयोगी पडतं. याच कारणामुळे शत्रूपासून सुटका कशी करून घ्यावी, याबाबत आचार्य चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलंय? ते जाणून घेऊ या…

सतर्क आणि सावधान राहा

चाणक्य यांनी आपल्या शत्रूला कसं पराभूत करायचं? याबाबतही सांगितलेलं आहे. कठीण काळात तुम्ही या नीतीचा उपयोग करू शकता. तुम्ही तुमच्या शत्रूला कधीच कमकुवत समजू नका. काहीही झालं तरी तुमचे नुकसान करायचे, हा तुमच्या शत्रूचा एकमेव उद्देश असतो. त्यामुळेच तुम्ही सतर्क आणि सावधान राहिलं पाहिजे, असं आचार्य चाणक्य सांगतात.

…तर शत्रूला करता येतं पराभूत

शत्रू तुमच्यापेक्षा बलवान असेल तर त्याच्या मनासारखे वागूनच तुम्ही त्याचा पराभव करू शकता. शत्रूचे बळ हे समतूल्य असेल तर विनय तसेच बळाचा वापर करूनही त्याला पराभूत करता येऊ शकतं, असे चाणक्य सांगतात.

नेमकं काय-काय करावं?

धैर्य आणि संयम : तुम्ही शत्रूच्या फार जवळ असाल तेव्हा धैर्य आणि संयम ठेवणं गरजेचं असतं. धैर्य असेल तर योग्य निर्णय घेणे सोपे होते. तर संयमामुळे होणारे नुकसान टाळता येते.

योग्य वेळेची पाहा वाट : कोणतेही काम करण्याआधी योग्य वेळेची वाट पाहा. घाईत केलेल्या कामामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. विशेषत: तुमच्या शत्रूविरोधात तुम्ही एखादी कृती करत असाल तर योग्य वेळेची वाट पाहणे गरजेचे आहे.

कमकुवत बाजू ओळखा : तुम्हाला शत्रूला पराभूत करायचं असेल तर त्याची कमकुवत बाजू ओळखा. ही बाब समजल्यास तुम्हाला त्याला पराभूत करणं सोपं होतं.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही करत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.