AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकांना भरावा लागेल दंड, वाचा आरबीआयची नवीन सूचना

हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे.

एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकांना भरावा लागेल दंड, वाचा आरबीआयची नवीन सूचना
| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 8:22 AM
Share

नवी दिल्ली : कित्येक वेळा असे होते की कार्ड एटीएममध्ये घातले पण पैसे आले नाहीत. एटीएमच्या डिस्प्लेवर लिहिलेले असते – आऊट ऑफ कॅश(Out of Cash), तात्पुरते सेवाबाह्य(Temporarily Out of Service) इ. अनेक वेळा असे देखील लिहिले असते की यासाठी तुम्ही बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा आणि अनेक वेळा असे देखील होते की एटीएम डिस्प्लेवर आधीच संदेश चालू असतो की मशीनमध्ये रोख रक्कम नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांना पैसे न काढताच मागे परतावे लागते. आता रिझर्व्ह बँकेने यासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. आता ATM मध्ये पैसे नसतील तर बँकेला दंड ठोठावला जाईल. रिझर्व्ह बँकेने मंगळवारी ही घोषणा केली. (Banks will have to pay fines if there is no money in ATMs, read RBI’s new instructions)

नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होईल

हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. त्याच्या समिक्षेत असे आढळून आले की जर एटीएम ऑपरेशन पैशांच्या अभावामुळे झाले नाही तर सामान्य लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून, असे ठरवले गेले आहे की बँका किंवा व्हाईट लेबल एटीएम ऑपरेशन्स आपल्या सिस्टीम दुरुस्त करावे आणि एटीएममध्ये रोख उपलब्धतेचे अपडेट ठेवावे जेणेकरून पैशाची कमतरता दूर होईल. या नियमाचे पालन न केल्यास गंभीरपणे घेतले जाईल आणि आर्थिक दंड आकारला जाईल.

दंड किती असेल?

आरबीआयच्या मते, जर एका महिन्यात 10 तासांपेक्षा जास्त एटीएममध्ये रोख रक्कम नसेल तर त्या प्रकरणात 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. व्हाईट लेबल एटीएमच्या बाबतीत बँकांवर दंड आकारला जाईल. काही बँका एटीएममध्ये रोख रक्कम ठेवण्यासाठी कंपन्यांची सेवा घेतात. त्यांच्या बाबतीत बँकेला दंड भरावा लागेल. त्या बदल्यात बँक त्या व्हाईट लेबल एटीएम कंपनीकडून दंडाची भरपाई करू शकते. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की एटीएममध्ये रोख रक्कम नसल्यास, सिस्टम जनरेटेड स्टेटमेंट द्यावे लागेल. हे स्टेटमेंट RBI च्या इश्यू डिपार्टमेंटला पाठवले जाईल ज्या अंतर्गत ATM येते. मिंटने एका अहवालात ही माहिती दिली आहे.

आधीच 100 रुपयांचा नियम आहे

असे बरेचदा घडते की एटीएममधून पैसे काढले गेले नाहीत परंतु खात्यातून वजा केले गेले. आरबीआयने याबाबत नियमही बनवले आहेत. ज्या बँकेच्या एटीएममध्ये हे घडते त्याच्या वतीने नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. यासाठी पंजाब नॅशनल बँकेने एक विशेष नियम केला आहे. पंजाब नॅशनल बँकेने सांगितले आहे की जर व्यवहार पूर्ण झाला नाही तर पैसे लगेच खात्यात जमा होतात. यासाठी ग्राहकाला कोणतीही तक्रार करण्याची गरज नाही. जर हे कधीच शक्य नसेल तर RBI च्या नियमांनुसार 7 दिवसांच्या आत तक्रार निकाली काढणे आवश्यक आहे. पीएनबीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली आहे की आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 7 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यानंतर बँकेला दररोज ग्राहकाला 100 रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल. (Banks will have to pay fines if there is no money in ATMs, read RBI’s new instructions)

इतर बातम्या

औरंगाबादमध्ये कोरोना लसींचा काळाबाजार उघड, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडणं ही शरमेची बाब, सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.