AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Card : आधार कार्डच्या मदतीने तपासा बँक खात्यातील रक्कम, असा घ्या या सेवेचा फायदा

Aadhaar Card : आधार कार्डचा केवळ ओळखपत्र म्हणूनच वापर होत नाही तर तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठीही तुम्हाला आधार कार्डची मदत घेता येते.

Aadhaar Card : आधार कार्डच्या मदतीने तपासा बँक खात्यातील रक्कम, असा घ्या या सेवेचा फायदा
| Updated on: Feb 05, 2023 | 10:10 PM
Share

नवी दिल्ली : सध्याच्या डिजिटल युगात आधार कार्ड (Aadhaar Card) भारतीय नागरिकांसाठी महत्वाचा पुरावा आहे. आधार कार्ड सर्व सोयी-सुविधांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. यामध्ये बँकिंग आणि सरकारी सेवांचा समावेश आहे. आधार कार्डला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक लिंक असल्यास तुम्हाला मोठा फायदा होतो. तुम्हाला बँकेच्या खात्यातील (Bank Account) रक्कम तपासण्यासाठी बँकेत जाण्याची, एटीएमवर जाऊन खात्यातील रक्कम तपासण्याची गरज नाही. आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला बँक खात्यातील रक्कम (Balance) तपासता येते.

आधार कार्ड आता जवळपास सर्वच योजनांशी लिंक असते. या योजनेच्या अपडेट तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून कळतात. आधार कार्डवर प्रत्येक व्यक्तिचे नाव, जन्म तारीख, लिंग, घराचा पत्ता आणि फोटो असतो.

तुम्ही 12 आकड्यांचा आधार कार्ड क्रमांकाचा वापर करुन बँक खात्यातील बॅलन्स चेक करु शकता. त्यासाठी बँकेच्या शाखेत, एटीएमवर जाण्याची काहीच गरज नाही. घरबसल्या तुम्हाला खात्यातील रक्कम तपासता येते.

आधार कार्डच्या युझर्सला बँकेचे केवळ बॅलेन्सच चेक करता येत नाही, तर रक्कम ही दुसऱ्या खात्यात हस्तांतरीत करता येते. सरकारी मदतीसाठी विनंती पाठविता येते. तसेच पॅन कार्ड मिळविण्यासाठी आधारा कार्डचा वापर करता येतो.

बँक खात्यातील बॅलन्स तपासायचा असेल तर सोपी प्रक्रिया आहे. त्याआधारे तुम्हाला खात्यातील शिल्लक रक्कम तपासता येईल. सर्वात अगोदर वापरकर्त्याला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन *99*99*1#- यावर कॉल करावा लागेल.

हा क्रमांक डायल केल्यानंतर त्याच्या आधार कार्डाचे 12 आकडे टाकावे लागतील. त्यानंतर आधार क्रमांक पुन्हा टाकावा लागेल. हा क्रमांक व्हेरिफाय करावा लागेल. त्यानंतर सर्वात शेवटी UIDAI च्या स्क्रीनवर तुम्हाला बँक बँलेन्स फ्लॅश एसएमएसच्या माध्यमातून दिसेल.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) अजून काही सेवांची घोषणा केली आहे. त्यानुसार, आधारच्या माध्यमातून इतर सेवा घरपोच देण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी करण्यात आली आहे. लवकरच ग्राहकांना अनेक सेवा घरपोच मिळतील. यामध्ये आधारकार्डची माहिती अपडेट करता येणार आहे.

  1. MY Aadhaar पोर्टलवर ऑनलाईन पत्ता अपडेट करता येईल
  2. पत्ता अपडेट करण्यासाठीचा पर्याय निवडा
  3. कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाका
  4. प्रमाणित कागदपत्रे अपलोड करुन त्याचा पडताळा करा
  5. आता अर्जासोबत 50 रुपयांचे शुल्क जमा करा
  6. त्यानंतर SRN कुटुंब प्रमुखांसोबत शेअर करण्यात येईल
  7. कुटुंब प्रमुखाला याविषयीचा एसएमएस पाठविण्यात येईल
  8. 30 दिवसांच्या आत कुटुंब प्रमुखाला परवानगी देता येईल
  9. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.