AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPS Benefits Alert | सरकारचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनाही अजीवन पेन्शन, अमृत महोत्सवी वर्षात सरकारचा मदतीचा हात

EPS Benefits Alert | कर्मचारी निवृत्ती योजनेतील वारसदारांविषयी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सदस्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर विधवा पत्नी इतकेच मासिक पेन्शन आई-वडिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

EPS Benefits Alert | सरकारचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनाही अजीवन पेन्शन, अमृत महोत्सवी वर्षात सरकारचा मदतीचा हात
सरकारचा मोठा निर्णयImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 22, 2022 | 12:13 PM
Share

EPS Benefits Alert | केंद्र सरकार अनेक सामाजिक सुरक्षा योजना (Social Security Scheme) राबविते. यामध्ये कर्मचारी निवृत्ती योजना 95 याचा ही समावेश होतो. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेतंर्गत (EPFO) पीएफ खाते उघडण्यात येते. या खात्यात EPS चेही खाते अंतर्भूत असते. या खात्याला कर्मचारी पेन्शन योजना(Employee Pension Scheme), ईपीएस (EPS)95 अथवा ईपीएफ (EPF)पेन्शन अशा नावाने ओळखल्या जाते. ईपीएस योजनेविषयीचा एक वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात गाजत आहेत. त्यावर चर्चा ही झडत आहे. पण सरकारने या दरम्यान एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीप्रमाणेच त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या आई-वडिलांनाही अजीवन मासिक पेन्शन (Lifelong Monthly Pension) देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

ईपीएफओने केले ट्विट

कामगार आणि रोजगार मंत्रालय (Labour and Employment Ministry) आणि भविष्य निर्वाह निधी संघटनेने याविषयीचे ट्विट केले आहे. संघटनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन (Twitter Handle) हे ट्विट करण्यात आले आहे. त्यानुसार, ईपीएस 95 योजनेतंर्गत पालक आणि वारसांना फायदा या शिर्षकाखाली योजनेतील महत्वाचा बदल जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आता कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला जेवढे मासिक पेन्शन मिळते. तेवढेच मासिक पेन्शन तेही अजीवन कर्मचाऱ्याच्या पालकांना, आई-वडिलांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आई-वडिलांना मोठा दिलासा

या निर्णयाचा संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पालकांना,आई-वडिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. विधवा पत्नीसोबतच कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांनाही त्याचा फायदा पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी सरकारने कर्मचाऱ्याची विधवा पत्नी आणि मुलांनाही या योजनेतंर्गत लाभ दिला आहे. विशेष म्हणजे आई-वडिलांचे नाव वारस म्हणून जोडले नसले तरी या योजनेतंर्गत विहित कागदपत्रांआधारे पालकांनाी फायदा मिळणार आहे. आता कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील कितवा हिस्सा पालकांना देण्यात येईल आणि सरकार त्यात कितीची भर घालणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही.

काय आहे योजना?

ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातील (बेसिक+ महागाई भत्ता) 12 टक्के रक्कमेचे योगदान पीएफ खात्यात करण्यात येते. नियोक्ता, म्हणजे तुमची कंपनी हे योगदान पीएफ खात्यात जमा करते. ही रक्कम दोन भागात विभागली जाते. 12 टक्क्यांतील 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जाते तर 8.33 टक्के रक्कम ईपीएस 95 मध्ये जमा करण्यात येते. जमा रक्कमेनुसार, तुम्हाला निवृत्तीवेळी एक निश्चित पेन्शन मिळते.  योजनेतील बदलामुळे वृद्ध आई-वडिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.