AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC Policy : बंद होत आहे ही जोरदार परतावा देणारी योजना, तुम्ही गुंतवणूक केली का?

LIC Policy : एलआयसीच्या या योजनेत जोरदार परतावा मिळतो. गुंतवणूकदारांना आतापर्यंत चांगला फायदा झाला आहे. ही योजना लवकरच बंद होत आहे. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली आहे का?

LIC Policy : बंद होत आहे ही जोरदार परतावा देणारी योजना, तुम्ही गुंतवणूक केली का?
| Updated on: Feb 15, 2023 | 10:47 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) भारतीय विमा क्षेत्रातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी विमा कंपनी आहे. ही कंपनी ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या अनुरुप विविध विमा पॉलिसी देते. एलआयसीचे अध्यक्ष एम आर कुमार यांनी नुकतीच एक योजना बंद करण्याची घोषणा केली आहे. एलआयसी त्यांची लोकप्रिय योजना धन वर्षा योजना (LIC Dhan Varsha Scheme) बंद करणार आहे. याविषयीची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेतील ग्राहकांना यापूर्वीच योजनेचा फायदा मिळालाआहे. 31 मार्च, 2023 पर्यंत ही योजना उपलब्ध आहे. तोपर्यंत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येईल. त्यानंतर ही योजना बंद होईल. ज्यांना या योजनेत गुंतवणूक करायची आहे, त्यांनी आता घाई करणे आवश्यक आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने या योजनेत त्यांना गुंतवणूक करता येईल.

एलआयसी धन वर्षा योजना ही एक नॉन-लिंक, वैयक्तिक, बचत आणि एकल प्रीमियम विमा योजना आहे. ही योजना बचतीसोबत चांगला परतावा देते. पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास या योजनेत वारसदारांना लाभ मिळतो.या योजनेत गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.या योजनेत वारंवार प्रिमियम भरण्याची कटकटही नाही.

या योजनेतंर्गत गुंतवणुकीचे दोन पर्याय समोर येतात. पहिल्या पर्यायामध्ये गुंतवणूकदारांना प्रिमियम रक्कमेच्या 1.25 पटीत रिटर्न मिळतात. यामध्ये नामनिर्देशीत व्यक्तीला 10 लाख रुपयांपर्यंतच्या एकल प्रीमियमवर 12.5 लाख रुपये मिळतात. दुसऱ्या पर्यायात गुंतवणूकदारांना प्रीमियम रक्कमेच्या दहा पटीत परतावा मिळतो. 10 लाख रुपयांच्या एकल प्रीमियमवर, गुंतवणूकदाराचा मृत्यू ओढावल्यास त्याच्या वारसदारांना 1 कोटी रुपयांचा परतावा मिळतो.

विमाधारक योजनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत जीवंत राहिल्यास तर त्याला मोठा फायदा मिळतो. मूळ विमा रक्कमेसोबत त्याला हमी दिलेले सर्व अनषांगिक लाभ मिळतात. हे गॅरेटिंड रिटर्न दरवर्षाच्या शेवटी जमा होतात. तसेच पॉलिसीच्या मॅच्युरिटीवरही लाभ मिळतात.

एलआयसी धन वर्षा योजना ही दहा अथाव पंधरा वर्षांसाठी घेता येते. पॉलिसी ऑनलाईन अथवा ऑफलाईन खरेदी करता येते. तीन वर्षांपासून ते 60 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती पॉलिसी खरेदी करु शकते. जेवढी रक्कम गुंतवाल, तेवढा जास्त फायदा होतो.

एखादी पॉलिसी व्यपगत (Lapsed) झाली असेल तर ती सुरु करता येईल. एलआयसीने त्यासाठी मोहिम सुरु केली आहे. 1 फेब्रवारी 2023 ते 24 मार्च 2023 या कालावधीत विलंब शुल्क भरुन ही पॉलिसी सुरु करता येते.

1 लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर विलंब शुल्कावर 25 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. 3 लाख रुपयांच्या प्रीमियमवर 25 टक्क्यांची सूट मिळेल. तर 3 लाख आणि त्यापेक्षा अधिकच्या प्रीमियमवर 30 टक्के सूट मिळते. त्यानुसार दुहेरी फायदा होईल.

एलआयसी विम्याचे नुतनीकरण करण्यासाठी अट आणि नियमांचे पालन करावे लागेल. त्यानुसार अनपेड प्रीमियमची तारीख पाच वर्षांच्या आत नुतनीकरण करण्यात येईल. प्रीमियम भरताना आधुनिक तंत्राचा वापर केल्यास 5 रुपयांची विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे विलंब शुल्क भरताना त्याचा फायदा घेता येईल.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.