AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेच्या तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल, येत्या 1 एप्रिलपासून…माहिती नसल्यास थेट खिसा होणार रिकामा!

येत्या एक एप्रिल रोजीपासून रेल्वेच्या तिकीट बुकिंग आणि तिकीट कॅन्सलेशनच्या नियमात मोठा बदल होणार आहे. आता नवे नियम नेमके काय आहेत? ते जाणून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला हे नियम माहिती नसतील तर तुमच्या खिशाला मोठी झळ बसू शकते.

रेल्वेच्या तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल, येत्या 1 एप्रिलपासून...माहिती नसल्यास थेट खिसा होणार रिकामा!
railway ticket cancelation ruleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 31, 2026 | 4:30 PM
Share

Indian Railways Ticket Cancellation Refund Rules: येत्या 1 एप्रिल रोजीपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. आता नव्या आर्थिक वर्षासोबत अनेक महत्त्वाच्या नियमांत बदल होणार आहे. या बदललेल्या नियमांचा नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम पडणार आहे. येत्या 1 एप्रिल रोजीपासून रेल्वे विभागातही अनेक नियम बदलणार आहेत. याच बदलणाऱ्या नियमांपैकी तिकीट कॅन्सलेशनचा नियम खूप महत्त्वाचा आहे. कारण हा नियम तुम्हाला माहिती नसल्यास तुमच्या खिशाला मोठी झळ बसू शकते. त्यामुळेच हा नियम नेमका काय आहे? ते समजून गेऊ या..

तिकीट कॅन्सलेशनच्या नियमात नेमका बदल काय?

येत्या 1 एप्रिल 2026 रोजीपासून रेल्वे तिकीट कॅन्सलेशन आणि रिफंडच्या धोरणात महत्त्वाचा बदल झाला आहे. आता रेल्वेने आपला प्रवास सुरू करण्याच्या (डिपार्चर) 8 तास अगोदर प्रवाशांना तिकीट कॅन्सलेशन करावे लागणार आहे. 8 तासांनंतर तुम्ही तुमचे तिकीट रद्द करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक रुपयाही रिफंड मिळणार नाही. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी जरी तिकीट बुक केलेले असले तरी या नियमाचे पालन न केल्यास तुम्हाला एक रुपयाही रिफंड मिळणार नाही.

अन्य कोणकोणते नियम बदलले?

याआधी रेल्वेचा प्रवास सुरू होण्याच्या 4 तास अगोदर जरी तुम्ही तिकीट कॅन्सल केलं तरी तुम्हाला तुमचे तिकिटाचे पैसे रिफंड मिळायचे. आता मात्र तुम्हाला तुमचे पैसे रिफंड हवे असतील तर 8 तासांच्या अगोदर तिकीट कॅन्सल करावे लागणार आहे. तुम्ही ट्रेनचा प्रवास सुरू होण्याच्या 8 ते 24 तास अगोदर तिकीट कॅन्सल केले तर तुम्हाला 50 टक्के रिफंड मिळेल. 24 ते 72 तास अगोदर तिकीट कॅन्सल केले तर 75 टक्के रिफंड मिळेल. तसेच 72 तासांच्या अगोदर तुम्ही तिकीट कॅन्सल केले तर तुम्हाला तुमचे सर्व पैसे परत मिळतील.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय