उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ जि. कोल्हापूर येथील जनता हायस्कूल परिसर व अर्जुनवाड रोड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली. पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर,खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत असल्याने कोल्हापुरातील सखल भागात साचलेले पाणी आता ओसरायला सुरुवात झालीय. मात्र पाणी ओसरल्यानंतर आता पूरग्रस्त भागात चिखल, कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. पाणी ओसरल्यानंतर घरांची तसेच दुकानाची स्वच्छता करण्यासाठी स्थानिक नागरिकांची धडपड सुरू आहे. 2019 पेक्षा हे पाण्याची पातळी यावे अधिक असल्याने शेकडो लोकांच्या प्रापंचिक साहित्य नुकसान झालंय. शिवाय पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेला कचरा देखील अडकून पडला