34 दिवसांनंतर अखेर शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला. या पहिल्या टप्प्यात शिंदे गटाच्या नऊ तर भाजपच्या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विखे पाटील आणि महाजनांनी शपथ घेतली. तर सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि गावितांनाही मंत्रिपदावर संधी मिळाली आहे. महाराष्ट्रात सत्तेचा विस्तार होताच बिहारमध्ये सत्ताबदलाच्या हालचाली वाढल्या आहेत. नितीशकुमार भाजपची साथ सोडून लालूंच्या राजदबरोबर सरकार बनवण्याच्या तयारीत आहेत. राज्यपालांकडे नेत्यांची रिघ लागली आहे.