राज्यातील सत्ता बदल होताच त्याचे पडसाद पुण्यात दिसून आले आहेत. यावेळी पुण्यातील 75 शिवभोजन केंद्र बंद करण्यात आली आहेत. यातील काही शिवभोजन केंद्रांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. तर काही चालकांनी ती स्वत: हून बंद केली आहेत. मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत संपणार. उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यानंतर जे पाटी लावणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तर रखडलेल्या झोपडपट्टी योजना आता म्हाडा पूर्ण करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. दरम्यान सांगलीतील कन्या शाळेत महाहादगा साजरा करण्यात आला.