एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आता राज्यात सत्ता पालट झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यावर नागपुरात पहिल्यांदाच आले होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या. पक्षाध्यक्ष जेपी नड्डांनी पब्लिक स्टेटमेंट दिलं. सर्वांची इच्छा होती की सरकार बाहेर राहून चालत नाही. एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीनी सरकार चालवणं योग्य नाही. सरकार चालवायचं असेल तर सरकारमध्ये गेलं पाहिजे. माझ्या वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन करत निर्णय बदलला आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, असं फडणवीस यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस हे मंत्रीमंडळात नसणार असल्याची घोषणा स्वत: फडणवीस यांनीच केली होती.