एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठे वादळ आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन होऊन बऱ्याच दिवसांनी राज्यात मंत्री मंडळ विस्तार झाला. यामध्ये एकून 18 मंत्र्यांनी शपथ घेतली, यामध्ये शिंदे गटाचे 9 आमदार तर भाजपाच्या 9 आमदरांनी शपथ घेतली. राज्यातील मंत्री मंडळ विस्तार लटकल्याने शिंदे सरकारवर टिका केली जात होती. मात्र, आता मंत्री मंडळ विस्तार झाला असून खाते वाटत बाकी आहे. खाते वाटपासंदर्भात आता सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे भाष्य केले असून खाते वाटप लवकरच होणार असल्याचे सांगितले आहे.