संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांसाठी महत्वाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सुनावणी होतेय. कपिल सिब्बल यांनी आधी आपली बाजू मांडली. आता अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) युक्तीवाद करत आहेत. यात त्यांनी विलिनीकरणासंदर्भात महत्वाचा मुद्दा मांडला आहेत. “विलिनीकरण न केल्यास अपात्रतेचाच विचार होतो”, असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले आहेत.