सरकार गेल्याने विरोधकांना फ्रस्ट्रेशन आलंय, आदित्य ठाकरे यांचा जोरदार टोला

| Updated on: Feb 13, 2022 | 11:56 PM

सरकार गेल्यापासून दोन वर्षात फडणविसांमध्ये फ्रस्ट्रेशन आलं आहे. विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसत आहे. कधी म्हणतात मुख्यमंत्री आहे, कधी म्हणतात नाही. कधी म्हणतात सरकार आहे, तर कधी म्हणतात नाही. मात्र, लोकांचा सरकारवर विश्वास आहे. जे डोळे बंद करुन फिरतात त्यांना काहीच दिसणार नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय.

Follow us on

महाविकास आघाडी सरकार 10 मार्चनंतर पडणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सरकार आपल्या ओझ्यानं पडेल असं सातत्यानं सांगतात. यावरुन युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीस आणि भाजपला जोरदार टोला लगावलाय. सरकार गेल्यापासून दोन वर्षात फडणविसांमध्ये फ्रस्ट्रेशन आलं आहे. विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसत आहे. कधी म्हणतात मुख्यमंत्री आहे, कधी म्हणतात नाही. कधी म्हणतात सरकार आहे, तर कधी म्हणतात नाही. मात्र, लोकांचा सरकारवर विश्वास आहे. जे डोळे बंद करुन फिरतात त्यांना काहीच दिसणार नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय. ते आज चंद्रपूर दौऱ्यावर होते.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली असून, त्यांची चौकशी सुरु आहे. अशावेळी संजय राऊत यांनीही ईडीच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्याचबरोबर अजून दोन पत्रकार परिषद घेत भाजपची पोलखोल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या मुद्दावर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता आम्ही सगळे संजय राऊत यांच्या सोबत आहो, तिन्ही पक्ष एकमेकांच्या सोबत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.