विधान परिषदेच्या निडणुकांमुळे राज्यातील राजकारण आता ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपापले उमेदवार निवडून येणार असा दावा करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर थेट देवेंद्र फडणवीस यांना आव्हान सगळ्यांना सोमवारीच कळेल असा पक्का दावाही अजित पवार यांनी केला आहे. राज्यसभेतील पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येक आमदारावर महाविकास आघाडीने लक्ष ठेवले आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने आपले आमदार वेगवेगळ्या महागड्या हॉटेलमध्यही ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीतील विजय आणि पराजय होईपर्यंत प्रत्येकानेच विजयाचा दावा करायचा असतो असंही त्यांनी सांगितले आहे.