बंडखोर आमदारांच्या नाट्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मात्र राज्यातील राजकारणानं वेगळं वळण घेतलं. त्यामध्ये खरा धक्का बसला तो एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून देवेंद्र फडणवीस आपण उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्यातील राजकीय खेळाचे गणित कोणालाचा मांडता येईन. मात्र अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्या या धक्कातंत्राच्या राजकारणांनं राज्यातील राजकारण बदलणार आहे एवढं मात्र नक्का. महानगरपालिका निवडणुका लागल्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल नेमकं देवेंद्र फडणवीस स्वतः उपमुख्यमंत्री का झाले आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांचा मुखूट का चढविला ते.