दादर चौपाटीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज समुद्र स्वच्छता केली. गणेश उत्सवानंतर समुद्र किनाऱ्याची दशा बघवत नाही, म्हणून आज यासाठी स्वत: उतरलो असल्याचे टिव्ही ९ शी बोलताना अमित ठाकरे यांनी सांगितले. स्वच्छतेचा कायमस्वरूपी प्लॅन करावा लागणार यासाठी शासन प्रशासन हाती यायला हवं, यावेळी लोकांनी प्रचंड उत्साहात सण साजरा केला, त्यामुळे सरकारचे आभार मानतो. मी लोकांमध्ये फिरतोय बोलतोय, तेव्हा एक चांगल पॅाझिटीव्ह वातावरण पहायला मिळतं आहे. मनसे आणि शिंदे गट यांची जवळीक आहेच, मात्र हा निर्णय राज साहेबांचा आहे, त्यावर ते स्वत:च बोलतील असं अमित ठाकरे यांनी सांगितले.