ओबीसी आरक्षणासंदर्भात जो निर्णय झाला आणि एसटी आणि एससी चे आरक्षण ठेवण्याचा निर्णय झाला, त्यानुसार निवडणुका लागणार आहेत. मात्र राज्य सरकार ओबीसींना सर्वतोपरी मदत करण्याच्या प्रयत्नात आहे. जी काळजी घ्यायला हवी ती घेत आहोत. यासंदर्भात एक कमिटी नेमली आहे. ही कमिटी सर्व माहिती तसेच इम्पिरिकल डेटा गोळा करत आहे. एकूणच त्यावर काम सुरू आहे, असे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी जीएसटी, अहमदनगर नामांतर आदी विषयांवरही भाष्य केले.