काल रात्रीपर्यंत 12 हजार कामावर हजर झाले होते. आज आणखी काही कामगार हजर होत आहेत. काही कामगारांनी कामावर येणार असल्याचं कळवलं आहे. कामावर येणाऱ्या कामगारांना आम्ही सरंक्षण देणार आहे. कामगारांच्या मनात असणारा संभ्रम कमी होईल आणि ते कामगार देखील कामावर येतील असा माझा विश्वास आहे, असं अनिल परब म्हणाले. कामगारांना आवाहन करतोय की विलीनीकरणाचा मुद्दा हायकोर्टाच्या समितीपुढं आहे. त्यामुळं कामगारांनी कामावर यावं, असं अनिल परब म्हणाले.