सोलापूर : आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय आणि मंत्रिपदावर बच्चू कडू यांचं उघड भाष्य केलंय. आता मी शांत बसणार नाही, मंत्रिपद गेलं चुलीत!, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेलं आहे. त्यामुळे आम्ही खुश आहोत. त्याचबरोबर याच खात्याचं मंत्रिपद मिळालं तर त्याचं सोनं करण्याचं काम आम्ही करू, असं बच्चू कडू म्हणालेत.