राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटो रिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर असून हे सरकार हलतही नाही आणि चालतही नाही. फक्त धूर सोडतंय, अशा शब्दात भाजप नेते अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारची खिल्ली उडवली. याचे प्रतिउत्तर बाळासाहेब थोरातांनी दिले आहे. महाराष्ट्रात तिन्ही पक्षांनी चांगलं काम केलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर नवा अध्यक्ष मिळेल. तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. अध्यक्ष कोण असेल ते पक्ष म्हणून चर्चा करुन ठरवू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.