बंडातात्या कराडकर वादग्रस्त वक्तव्य करतात हे मागच्या महिन्यात एका प्रकरणात संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले. प्रकरण चिघळल्यानंतर त्यांनी जाहीर माफी देखील मागितली होती. सध्या बंडातात्यांनी चक्क महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. Mahatma Gandhi यांचा अहिंसावाद आणि हिंदुत्व दोन्ही पक्षपाती असल्याचं बंडातात्या यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा हा चिघळण्याची शक्यता आहे. हुतात्मा राजगूरू यांच्या स्मृती स्थळावरून त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.