Bandra Accident | मोबाईलवर बोलत कार चालवणं जीवावर बेतलं! वांद्र्यात भरधाव कारची चिमुरड्याला धडक; अंशचा दुर्दैवी मृत्यू

Bandra Accident | मोबाईलवर बोलत कार चालवणं जीवावर बेतलं! वांद्र्यात भरधाव कारची चिमुरड्याला धडक; अंशचा दुर्दैवी मृत्यू

| Updated on: Aug 31, 2026 | 11:06 AM

मुंबईतील वांद्रे परिसरात एका भीषण कार अपघातात आठ वर्षांच्या चिमुरड्या अंश रवींद्र गुप्ताचा मृत्यू झाला. मोबाईलवर बोलत असताना कार चालवत असलेल्या मेघा रावलने त्याला धडक दिली. उपचारादरम्यान अंशचा जीव गेला असून, पोलिसांनी रावलला अटक केली आहे. निष्काळजी वाहनचालकामुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबई, महाराष्ट्र: मुंबईच्या वांद्रे परिसरात एका भीषण अपघातात अंश रवींद्र गुप्ता या आठ ते नऊ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. कार चालवणारी महिला, मेघा रावल, त्यावेळी मोबाईलवर बोलत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माऊंट मेरीच्या पायथ्याशी असलेल्या बस स्टॉपजवळ हा अपघात झाला. अंश हा बागेत खेळत असताना रस्त्यावर आला आणि त्याचवेळी मोबाईलवर बोलत असलेल्या मेघा रावलने चालवलेल्या कारची त्याला धडक बसली. कारचे चाक अंशच्या छातीवरून गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, अंश गुप्ताचा मृत्यू झाला.

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी कारचालक मेघा रावलला अटक केली आहे. मोबाईलवर बोलत वाहन चालवणे किती जीवघेणे ठरू शकते, याचे हे एक दुर्दैवी उदाहरण आहे. निष्काळजीपणामुळे एका चिमुरड्याचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

Published on: Aug 31, 2026 11:06 AM
Follow Us