‘… तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही’,भरत जाधव यांना का आला संताप? नेमकं कारण काय?

| Updated on: Aug 02, 2023 | 2:48 PM

अभिनेते भरत जाधव यांनी रत्नागिरीतल्या नाट्यगृहाच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी भरत यांच्या 'तू तू मी मी' या नाटकाचा प्रयोग रत्नागिरीमध्ये होता. त्यावेळी नाट्यगृहातील एससी आणि साऊंड सिस्टिंमवरून भरत जाधव यांची नाराजी पाहायला मिळाली.

Follow us on

रत्नागिरी : अभिनेते भरत जाधव यांनी रत्नागिरीतल्या नाट्यगृहाच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी भरत यांच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग रत्नागिरीमध्ये होता. त्यावेळी नाट्यगृहातील एससी आणि साऊंड सिस्टिंमवरून भरत जाधव यांची नाराजी पाहायला मिळाली.नाटकाच्या प्रयोगानंतर भरत जाधव यांनी ‘एससी नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून पाहा’, अशी विनंती प्रेक्षकांना केली. अशी परिस्थिती असताना प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता? नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असं त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केलं.