‘डबल इंजन सरकार’ने आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोलावं; पटोलेंचा भाजपला टोला

| Updated on: Apr 14, 2023 | 11:41 AM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिंदे-फडणवीस यांनी टोला लगावला आहे. यावेळी पटोले यांनी, फडणीस हे सत्तेत आहेत. राज्यात त्यांचे डबल इंजनचे सरकार आहे

Follow us on

नागपूर : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसवर हल्ला चढवत राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यांनी आता काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात काही राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांचे लोक हळूहळू भाजपमध्ये येत असल्याची टीका केली होती. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिंदे-फडणवीस यांनी टोला लगावला आहे. यावेळी पटोले यांनी, फडणीस हे सत्तेत आहेत. राज्यात त्यांचे डबल इंजनचे सरकार आहे. मग शेतकरी का आत्महत्या करतो याचे उत्तर आधी द्या असे म्हटलं आहे. तर राजकारण करण्यापेक्षा सत्तेत आहात लोकांना फायदा मिळू द्या, फोडाफोडीमध्ये त्यांना काहीच भेटणार नाही. तर तोडणारी लोक जास्तीत जगू शकत नाही असा टोला लगावला आहे.