मुंबई विमानतळाबाहेर एका चारचाकी गाडीला आग लागल्याची घटना काल रात्री घडलीयं. गाडीला आग लागली असताना त्याच ठिकाणाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. गाडीला लागली आग पाहून एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा थांबून विचारपूस करत चालकाला दिलासा देत त्याची विचारपूस केली. मात्र, यावेळी गाडीला आग लागल्याने हताश असलेला चालक बघून मुख्यमंत्री म्हणाले की, आपला जीव वाचला हे अत्यंत महत्वाचे आहे, अशा गाड्या तर आपण कितीही घेऊ शकतो.