देशात चौफेरे कोरोनाचं थैमान सुरु आहे. मात्र, त्यावरुन काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाहक बदनामी करत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. इतकंच नाही आता जरी निवडणुका घेतल्या तरी मोदींच्या नेतृत्वात 400 जागांवर जिंकून येऊ, असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिलंय. या विषयाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !